शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

आता आदिवासींना पाच वर्षासाठी ‘कोर्ट फी’ माफ, शासनाच्या महसूल व वनविभागाकडून ७ जून रोजी अधिसूचना जारी

By गणेश वासनिक | Updated: June 17, 2024 20:02 IST

पीडित, शोषित आदिवासींना मिळणार न्याय

अमरावती: अनुसूचित जमातीतील व्यक्तींना प्रदेय असलेली महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम (१९५९ चा ३६) याच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचिमध्ये नमूद केलेली संपूर्ण किंवा कोणतीही फी पाच वर्षाच्या कालावधीकरिता माफ करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने ७ जून २०२४ रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. या योजनेला राज्य शासनाने ‘आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचित जमाती न्यायालय फी माफी योजना २०२४ ’ असे नाव दिले आहे.

महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम ( १९५९ चा ३६) याच्या कलम ४६ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात किंवा अर्ध-न्यायिक प्राधिकरणात दाखल करावयाच्या, निष्पादित करावयाच्या किंवा नोंदवावयाच्या, उक्त अधिनियमास जोडलेल्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचिमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजांच्या बाबतीत प्रदेय असलेली संपूर्ण फी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या ७ जून २०२४ या दिनांकापासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी माफ करण्यात आलेली आहे. याचा फायदा राज्यातील आदिवासी समाज बांधवांना मिळणार आहे......................गरीब, सामान्य आदिवासींना मोठा दिलासाराज्यशासनाने ‘आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचित जमाती न्यायालय फी माफी योजना २०२४ ’ लागू केल्यामुळे आदिवासींना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी शेती, घरे, जात वैधता प्रकरण, संपत्तीचे काही विवादित प्रकरणे गरीब, सामान्य आदिवासी कुटुंब पैशाविना न्यायालयाच्या पायऱ्या चढू शकत नव्हते. मात्र आता राज्य शासनाने न्यायालय फी माफी योजना सुरू केल्यामुळे चांद्यापासून तर बांध्यापर्यंत असलेल्या आदिवासी बांधवांना पैसे नाही म्हणून न्यायालयात दाद मागू शकत नाही, ही बाब संपुष्टात आली आहे. राज्य शासन न्यायालयीन फी देणार असल्याने पीडित, शोषित आदिवासींना न्याय मिळेल, अशी माहिती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी ‘लोकमत’शी बाेलताना दिली.

 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCourtन्यायालय