शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
5
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
6
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
7
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
8
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
9
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
10
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
11
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
13
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
14
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
15
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
16
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
17
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
19
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
20
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का

"आता पाकिस्तानात जाऊन हनुमान चालिसा म्हणू! विश्वात भारताचा तिरंगा..."; DCM फडणवीस यांचे उद्गार

By गणेश वासनिक | Published: September 10, 2023 5:52 PM

...पण लक्षात ठेवा, आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अमरावती : हनुमान चालिसा पठण केले म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात खासदार-आमदार राणा दाम्पत्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून थेट १२ दिवस जेलमध्ये पाठविण्यात आले. पण लक्षात ठेवा आता हनुमान चालिसा भारतातच नव्हे, तर पाकिस्तानात जाऊन म्हणू, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे काढले.

अमरावती येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेत ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. चंद्रयान-३ हे दक्षिण ध्रुवावर उतरविणारा भारत देश पहिला ठरला आहे. त्यामुळे आता इंडिया नव्हे तर भारत मातेचा नारा गुंजणार आहे. भारत हा प्रभू श्रीराम, हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे. तामिळनाडू राज्य सरकारातील प्रबळ मंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्म हा कोविड, मलेरियासारखा असून, तो संपणार असे व्यक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, हिंदू धर्म कधीही संपणार नाही. यापूर्वीदेखील अनेकदा आक्रमण झालेत. पण स्टॅलिनसारखे हजारो आले तरी हिंदू धर्म कोणीही नष्ट करू शकत नाही. या देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे, म्हणूनच विश्वात भारताचा तिरंगा डौलाने फडकत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मंचावर खासदार नवनीत राणा, डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता राजपाल यादव, भाजपचे नेते किरण पातुरकर, ॲड. प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर यासह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होेते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPakistanपाकिस्तान