शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
2
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
3
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
4
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
5
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
7
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
8
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
9
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
10
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
11
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
12
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
13
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
14
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
15
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
16
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
17
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
18
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
19
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
20
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा

टँकरची संख्या घटली, पण पाणी समस्या नाही मिटली; ९ ठिकाणी टँकरने, तर ६४ गावांत विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

By जितेंद्र दखने | Published: July 09, 2024 10:22 PM

महिनाभरात १८ वरून टँकरची संख्या १२ पर्यंत घसरली आहे. असे असले तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांत टँकर सुरू आहेत, तर १४ पैकी १० तालुक्यांमधील ६४ गावांमधील वाड्या वस्तीवर ३४ बोअरवेल आणि ४४ विहीर अधिग्रहण अशा ७८ अधिग्रहणांद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे.

अमरावती : जुलैच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली; मात्र त्यानंतरही पावसाने म्हणावा तसा जोर पकडलाच नाही. एखादा दिवस जोरदार पाऊस कोसळला मात्र त्यानंतर पुन्हा मान्सूनची वाटचाल अद्यापही अडखळतच सुरू आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा अपेक्षित वाढत नसल्याने पाणीपुरवठा करणारे टँकर पूर्णतः बंद झालेले नाहीत.

महिनाभरात १८ वरून टँकरची संख्या १२ पर्यंत घसरली आहे. असे असले तरी अद्यापही मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांत टँकर सुरू आहेत, तर १४ पैकी १० तालुक्यांमधील ६४ गावांमधील वाड्या वस्तीवर ३४ बोअरवेल आणि ४४ विहीर अधिग्रहण अशा ७८ अधिग्रहणांद्वारे नागरिकांची तहान भागविली जात आहे. त्यामध्ये चिखलदरा तालुक्यातच टँकर व बोअरवेल अधिग्रहण अधिक आहेत. यापाठोपाठ इतर नऊ तालुक्यांत केवळ विहीर व बोअरवेल अधिग्रहीत करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत मान्सूनने दमदार हजेरी लावली तर ही स्थिती झपाट्याने बदलूही शकते.

या गावांना टँकरने पाणीपुरवठामेळाघाटातील चिखलदरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गोलखेडा बाजार, गवळीढाणा, स्कूलढाणा, कालापांढरी आदी अशा ९ गावांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ आतापर्यंत १८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आता या संख्येत घट झाली आहे. केवळ सध्या चिखलदरा तालुक्यात ९ गावांत १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस पडल्यास हेही टँकर बंद होतील.दीपेंद्र कोराटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWaterपाणीAmravatiअमरावती