शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

दीडशे रुपयांसाठी काढावे लागणार हजाराचे बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:10 AM

शालेय पोषण आहार योजना : पालकांना आर्थिक भुर्दंड अमरावती : शालेय पोषण आहार योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा ...

शालेय पोषण आहार योजना : पालकांना आर्थिक भुर्दंड

अमरावती : शालेय पोषण आहार योजनेची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यंदाच्या उन्हाळी सुटीतील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. मात्र, ही रक्कम कमी अन् त्यासाठी खाते काढण्याचा खर्चच अधिक आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शासन निर्देशानुसार केवळ उन्हाळी सुटीतील पोषण आहारासाठी ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी प्रतिविद्यार्थी ४.४८ रुपये दिले जातात. सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना दररोज ६.७१ रुपये दिले जातात. दोन महिन्यातील कामकाजाचे दिवस लक्षात घेतल्यास पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये ८० पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २४४ रुपये ८५ पैसे मिळणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. एवढ्या कमी रकमेसाठी पालकांना विद्यार्थ्यांचे बँकेत खाते उघडावे लागणार आहे. बँकेत खाते काढण्यासाठी साधारणपणे एक हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याशिवाय बँक खाते उघडण्यासाठी ग्रामीण भागातील पालकांना हातातील कामे सोडून जावे लागत आहे. तेथे बँकेत एकदा जाऊन कामे होत नसल्याने पालकांना वारंवार मजुरी पाडून हे काम करावे लागणार आहे. याआधी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी अल्पसंख्याक सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीसाठी बँक खाते काढण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अनेक पालकांनी अशी खाती काढली नाही. ज्यांनी काढली, त्यांच्या खात्यावर व्यवहार झाले नाहीत. खात्यात किमान शिल्लक नसल्याने अनेक खाती बंद पडली आहेत. काहींना दंडही ठोठावला गेला आहे. शिक्षकांनी ही खाती उघडून घेतल्यानंतर दंड पडल्याने त्यांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

बॉक्स

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी?

पहिली - ३८७१५

दुसरी - ४०२७०

तिसरी - ४३८०१

चौथी - ४५२०३

पाचवी - ४४०३३

सहावी - ४४७२७

सातवी - ४४३१८

आठवी - ४४७४३

बॉक़्स

पालकांची डोकेदुखी

कोट

शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी त्यांचे बँक खाते काढावे लागणार आहे. याकरिता गोरगरीब पालकांना पैस खर्च करावा लागेल. ही बाब आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही.

- चंद्रशेखर मेहरे, पालक

कोट

मुलांना पोषण आहाराऐवजी रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, मोलमजुरी करणाऱ्या आमच्यासारख्या पालकांना दोनशे रुपयांसाठी हजार रुपये खर्च करणे कठीण आहे. त्यामुळे पोषण आहार दिला, तर बरे होईल.

- अजय बोबडे, पालक

बॉक्स

लाभापेक्षा भुर्दंड अधिक

पाेषण आहाराऐवजी आता विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये ८० पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २४४ रुपये ८५ पैसे मिळणार आहेत. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मात्र, यासाठी काढावे लागणाऱ्या बॅक खात्यासाठी लाभापेक्षा आर्थिक भुर्दंड अधिक आहे.

कोट

शासनाने पोषण आहाराऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांना सूचना दिल्या आहेत. याही पुढे वरिष्ठस्तरावरून प्राप्त होणाऱ्या सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल.

- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)