शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

अप्पर वर्धात केवळ २६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 10:09 PM

शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे संकेत : दैनंदिन पुरवठ्याचे नियोजन कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरासह अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा प्रकल्पात केवळ २६.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन महिन्यांत या साठ्यात झपाट्याने घट झाली आहे. त्यामुळे अमरावतीकरांवर पाणीकपातीचे काळे ढग आहेत. गतवर्षी १५ जानेवारीस या धरणात तब्बल ६७.०६ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. त्यात यंदा निम्म्यापेक्षाही अधिक घट झाली आहे.मराठवाडा व पूर्व विदर्भावर भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाची पाणीपातळी खालावल्याने अमरावती शहरावरदेखील पाणीटंचाईचे सावट आहे. शहराला मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. अमरावतीकरांची तृष्णा भागविण्यासाठी अप्पर वर्धा जलाशय हे उपयुक्त आहे. इतरत्र पाणीटंचाई असताना, या धरणाने आजवर अमरावतीकरांना कधीही धोका दिला नाही, असा इतिहास आहे. परंतु, यावर्षी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.अप्पर वर्धा धरणाची क्षमता ५६४.०५ दशलक्ष घनमीटर आहे. यात ११४.२२ दलघमी मृत साठा धरल्यास एकूण क्षमता ६२८.२७ दलघमीपर्यंत पोहोचतो. तथापि, सध्या धरणात १४८.३९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच २६.३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या दोन महिन्यांत पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे.औष्णिक विद्युत प्रकल्पाला देखील पाणीअप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठ्यासोबतच उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनाची सोय करण्यात येते. रब्बी हंगामामध्ये सिंचनासाठी धरणातून पाणी सोडले जाते. नांदगाव पेठ येथील कोळशावर आधारित रतन इंडिया कंपनीच्या सोफिया या औष्णिक विद्युत प्रकल्पालादेखील पाणी सोडण्यात येते. वीज प्रकल्प गतवर्षीपासून सुरू झाला व त्यानंतर धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात घटत गेल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.