शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

दहापैकी सात अमरावतीकरांनाच बायकोचा मोबाईल क्रमांक पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:10 AM

अमरावती : एकविसाव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीचा उच्चांक गाठला. या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. एखादा ...

अमरावती : एकविसाव्या शतकापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रगतीचा उच्चांक गाठला. या क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. एखादा माणूस जिथे कुठे असेल, तेथे शेतात, जंगलात, कार्यालयात, कारखान्यात किंवा इतरत्र रस्त्यावर त्याच्याशी सहजतेने संपर्क साधता यावा, या जिज्ञासेतून माणसाने भ्रमणध्वनीचा शोध लावला आणि मोबाईल क्रांती घडून आली. मात्र, त्यामुळे स्मरणशक्तीवर ताण कमी झाला आहे. टचपॅडवर बोट लावताच सर्व काही येत असल्याने बायकोचा मोबाईल क्रमांकही दहापैकी सात अमरावतीकरांना पाठ नसल्याचे दिसून आले.

मोबाईल आज सर्वांचीच गरज झाली आहे. प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. मात्र, मोबाईलमुळे स्मरणशक्तीचा वापर कमी झाला असून, माणूस परावलंबी झाला आहे. कुणाचाही नंबर वारंवार डायल करण्याऐवजी मोबाईलमध्ये तो सेव्ह करण्याची व्यवस्था आहे. केवळ तो सर्च करावा लागत असल्याने आठवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे अनेकांना पत्नीचाही नंबर पाठ नसल्याचे पाहायला मिळत आहे. ‘लोकमत’ने राजकमल चौक, राजापेठसह प्रमुख चौकांमध्ये प्रत्येकी दहा जणांच्या घोळक्यात पत्नीचा मोबाईल क्रमांक किती जणांना पाठ आहे, याबाबत विचारणा केली. सात जणांनाच मोबाईल नंबर पाठ असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले. विसराळूंना त्यांच्या प्रिय पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे पहिले सहा क्रमांकदेखील आठवत नव्हते.

बाॅक्स

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

महापालिका शाळेतील एका शिक्षकाला बायकोचा नंबर लक्षात नव्हता. मात्र, पूर्वी स्वत: वापरत असलेले सिम कार्ड मुलाला दिल्याने तो क्रमांक बरोबर आठवत असल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या नंबरवर दरमहा रिचार्ज करावा लागत असल्याने तो क्रमांकही आपसूकच पाठ झाला आहे.

-----------

यामुळे क्रमांक पाठ

काही जणांना पत्नीसह मुलगा आणि मुलीचा नंबर मुखपाठ होता. मात्र, त्यातही गोम होती. विसरभोळा स्वभाव असल्याने अनेकदा मोबाईल घरीच राहून जातो. अशावेळी संपर्क साधण्यात अडचण येऊ नये म्हणून कुटुंबातील पत्नी, मुलाचा नंबर पाठ केल्याचे एका महसूल कर्मचाऱ्याने सांगितले.

बाॅक्स

‘पाठ करण्याची गरजच काय?’

‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत १० जणांना मोबाईल नंबर पाठ आहे का, अशी विचारणा करण्यात आली. यातील सात जणांनी नंबर मुखपाठ असल्याची कबुली दिली. एक-दोघांनी तो डायल करून पडताळून पाहा, येथपर्यंत आत्मविश्वास दाखविला. उर्वरित व्यक्तींनी पत्नीचा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह असल्याने पाठ असण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

------------------

पोरांना आठवतो, मोठ्यांना का नाही?

लहान मुले आई-वडील यांनाच अधिक कॉल करतात. एखाद्या वेळेला आपल्या मित्र अथवा मैत्रिणीला कॉल करण्याचा प्रसंग ओढवतो. त्यामुळे लहान मुलांना आई-बाबांचे नंबर पाठ असतात. मोठ्या लोकांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर राहत असल्याने त्यांना मोबाईल क्रमांक लक्षात राहत नाहीत.

- आशिष साबू, मानसोपचार तज्ञ्ज

------------

कोट

बायकांनाही नवऱ्याचा नंबर नाही पाठ

मोबाईलमध्ये पतीदेवाचा नंबर सेव्ह केला आहे. त्यामुळे पाठ करण्याची गरजच पडली नाही. टोपणनावाने सेव्ह केला असल्याने सर्च करताच नंबर येतो. मात्र, नंबर मुखोद्गत नाही.

- गृहिणी,

पूर्वी मोबाईल नंबर पाठ होता. मात्र, आता नंबर सेव्ह असल्याने, शिवाय पतीदेवासोबत दररोजच बोलणे असल्याने रिसेंट कॉल लिस्टमध्ये तो दिसतो. त्यामुळे नंबर पाठ करण्याची गरज पडली नाही. केवळ अखेरचे दोन आकडे पाठ आहेत.

- गृहिणी, अमरावती.

कोट

मुलांना आई-बाबांचा नंबर पाठ

लहान असतानाच मोबाइल नंबर पाठ करण्याची सवय पडली. त्यामुळे बाबांचाच नव्हे तर, कुटुंबातील सर्वांचाच नंबर मुखपाठ आहे. दूरध्वनीवरून नेहमीच नंबर डायल करावा लागत असल्याने केव्हाही विचारला तर सहज सांगता येतो.

- मुलगा.