शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका; फळबागांना अतिवृष्टीमुळे लागली गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 11:14 AM

Amravati : पावसाने गळती : वघाळ, काटी, राजुरा भागांतील बागांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार/वरूड : संत्रा फळबागांसह मोसंबी फळबागांना अतिवृष्टीमुळे गळती लागली असून, यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे.

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्रा फळबागांबरोबर मोसंबी फळबागा येथे अंदाजे आठ ते दहा हजार हेक्टरवर उभ्या आहेत. गेली २० दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला. संत्रा व मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान निदर्शनास येत आहे.

वघाळ, काटी, राजुरा बाजार, आलोडा, नांदगाव, हातुर्णा, गाडेगाव, वंडली, भापकी, बेलोरा, लोणी, अमडापूर या गावांच्या शिवारातील संत्रा व मोसंबी फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे. बागेत गळालेल्या फळांचा सडा पाहायला मिळत आहे. कृषी शास्त्रज्ञांनी तातडीने या बुरशीजन्य रोगास आटोक्यात आणून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविण्याची मागणी होत आहे. फळांची गळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की, झाडावर फळ राहतील की नाही, याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. संत्रा व मोसंबी फळबागांची या अतिवृष्टीमुळे अतोनात हानी झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

लोकप्रतिनिधींनी या नुकसान झालेल्या बागांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनदरबारी आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आंबिया बहारची फळगळ ही संततधार पावसामुळे असल्याचे तालुका कृषी अधिकारी अतुल आगरकर यांनी सांगितले.

"मोसंबी झाडावर एवढ्या प्रमाणात अजून गळ पाहिली नाही. झाडावर फळे राहतील की नाही, याची आज शाश्वतीच राहिली नाही. शास्त्रज्ञांनी बांधावर येऊन मार्गदर्शन करावे."- अरुण कुसरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, गाडेगाव

"पावसाचे सातत्य राहिल्याने येथील संत्रा व मोसंबी फळबागांना जबर फटका बसला आहे. फळे मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त होत आहेत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. तातडीने सर्वेक्षण व भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे."- सुशांत पाचघरे, संत्रा उत्पादक शेतकरी, लोणी

"सततच्या पावसामुळे संत्रा झाडांची फळ गळती होत असल्याचे चित्र आहे. सततच्या पावसाने संत्रा- मोसंबीवर बुरशीजन्य फायटोप्थेराची लागण होण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्यांनी २०० लिटर पाण्यात एक किलो ट्रायकोडर्मा, एक किलो पीएसबी, एक लिटर अॅझेटोबॅक्टर, एक लिटर सुडोमोनस, दोन किलो गूळ, दोन किलो बेसन एकत्र करून झाडाच्या बुंध्याशी तातडीने आळवणी (ट्रेंचिंग) करावी. साचलेले पाणी चर खोदून बाहेर काढावे. गळलेली फळे शेताबाहेर फेकावी."-डॉ. के. पी. सिंह, शास्त्रज्ञ तथा कृषी विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर 

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरीAmravatiअमरावती