शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

राज्यात दोन लाख हेक्टरवरील संत्राला राजाश्रय मिळेल की नाही? भाव पडले

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: January 05, 2024 5:50 PM

राज्यात किमान २ लाख हेक्टरमध्ये संत्राचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के उत्पादन प्रामुख्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतल्या जाते.

अमरावती : आंबट गोड अशा अवीट चवीने सर्वांना भुरळ घालणारा नागपुरी संत्रा सध्या मातीमोल झालेला आहे. भाव पडल्याने व्यापारी फिरकत नाही, स्थानिक बाजारपेठेत उठाव नसल्याने आंबिया बहराची किमान ३० टक्के फळे झाडावरच आहेत व या फळांची मुदत संपली आहे. संत्राला राजाश्रय, प्रोत्साहन अन् निर्यात धोरण नसल्याने उत्पादकांची परवड होत आहे.

राज्यात किमान २ लाख हेक्टरमध्ये संत्राचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के उत्पादन प्रामुख्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतल्या जाते. पश्चिम विदर्भात ८० हजार हेक्टरमध्ये संत्राचे क्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने ६० ते ७० टक्के उत्पादक आंबिया बहर घेतात. जानेवारी ते फेब्रुवारीपासून पुढे नऊ महिने असा आंबियाच्या फळांचा कालावधी गृहीत धरला जातो. 

आता मुदत होत असल्याने फळ साल सोडण्याची व त्याच्या चवीत थोडा फरक पडण्याची शक्यता आहे व अशा परिस्थितीत भाव १२ ते १५ हजार रुपये टनावर आले आहेत. भाव पडले व स्थानिक बाजारात उठाव नसल्याने किमान ३० टक्के फळे झाडावरच आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती