शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
2
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
3
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
4
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
5
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
6
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
7
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
8
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
9
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
10
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
11
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
12
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
13
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
14
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
15
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
16
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
17
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
18
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
19
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर

ओव्हरस्पिड, ओव्हरटेकने घेतला युवक-युवतीचा बळी; कारचा चेंदामेंदा

By प्रदीप भाकरे | Published: December 19, 2022 5:27 PM

एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी पॉइंटजवळ भीषण अपघात, मुलगी अल्पवयीन

बडनेरा/ अमरावती: एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी पॉइंट जवळ भीषण अपघातातअमरावतीच्या युवक युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरधाव कार कट मारून एका ट्रकला ओव्हरटेक करताना ती कार रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा प्राणांतिक अपघात घडला. गौरी यशवंत शेळके (१७) व आदित्य अखिलेन्द्र विश्वकर्मा (१९, दोघेही राहणार: शिवाजीनगर, सूतगिरणी रोड, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर इर्विन रूग्णालयात मृतांचे नातेवाईक एकमेकांना भिडले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

आदित्य व गौरी हे एमएच ३४ बीआर १४९५ या क्रमांकाच्या कारने हायवेने जात असताना ती कार उभ्या ट्रकला भिडली. त्यावेळी आदित्य कार चालवत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार, आदित्य हा स्टेरिंगमध्ये फसला होता. तर, गौरी लगतच्या सीटवर बसली होती. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. घटनास्थळी धावून गेलेल्या नागरिकांनी पोलीस तसेच ॲम्बुलन्सला बोलावले. मात्र त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. धडक एवढी जबर होती की कारचा चेंदामेंदा झाला.

गौरी ही अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकत होती. सोमवारी सकाळी सात वाजता तिच्या वडिलांनीच तिला कॉलेजमध्ये सोडून दिले होते. तर, आदित्य हा नरसम्मा कॉलेजमधील १२ वीचा विद्यार्थी होता. दोघे शेजारी असल्याने त्यांच्यात ओळख होती. ती घट्ट करण्याच्या प्रयत्नात तो असल्याने त्याच्या व आपल्या कुटुंबात वाद देखील झाले होते, असे गौरीच्या वडिलांनी सांगितले. याप्रकरणी आदित्यविरूध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा गौरीच्या कुटुंबांनी घेतला होता. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मृत आदित्यविरूध्द गुन्हा दाखल केला.

कोतवाली पोलिसांत एनसी दाखल

मृत मुलीच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप मृत मुलाच्या चुलतभावाने केला. त्यांनी कोतवाली पोलिसांत धाव घेतली. मृताच्या चुलतभावाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी मुलीच्या काही नातेवाईकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शिवाजीनगरला कुठलाही राडा होऊ नये, म्हणून शहर कोतवाली पोलिसांनी मृत आदित्यच्या आईवडिलांसह अन्य नातेवाईकांना संरक्षण देऊन ठाणे परिसरातच राहण्याची सुचना केली.

इर्विनच्या अपघात कक्षात, बाहेर राडा

गाैरीला आदित्यने कॉलेजमधून पळवून नेले. त्याने तिला पळविलेच नसते, तर अपघात झाला नसता, त्यामुळे आमच्या मुलीच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला. तर, आदित्यच्या नातेवाईकांनी मुलीला दोषी ठरविले. यावरून मृत आदित्य व गौरीच्या कुटुंब व नातेवाईकांमध्ये चांगलाच राडा झाला. जमावातील अनेकांंनी इर्विनच्या अपघात कक्षात, बाहेर परस्परांना मारहाण केली. शिव्यांची लाखोली वाहिली. काहींनी आदित्यच्या मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन गृहासमोर देखील मृतांच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली.

गौरीच्या वडिलांची पोलिसात तक्रार

आमच्याच भागात राहणाऱ्या आदित्यने गौरीला फुस लावून पळवून नेले. तो तिच्याशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रकारावरून पुर्वी वाद देखील झाले होते. त्याने भरधाव कार चालविल्यानेच त्या दोघांचा मृत्यू झाला. आपल्या मुलीच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचे गौरीचे वडील यशवंत कृष्णराव शेळके यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अपहरण, अपघात व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरीच्या शवविच्छेदनास तिच्या कुटुंबियांनी होकार दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात