शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

चांदूर रेल्वेत ‘पाणीबाणी’ दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 6:27 PM

कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत. नगर परिषदेमार्फत दिवसाआड शहराला एक तास पाणीपुरवठा होतो. परंतु, भर दुपारी नळ सोडले जातात.

ठळक मुद्देगृहिणींना भर उन्हात भरावे लागते पाणी : प्रशासकीय यंत्रणा कोरोनात व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : महिना-दीड महिन्यांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. वरूडमधील पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेल्या येथील एका कुटुंबाचे थ्रोट स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातही कोरोनाची दहशत पाहावयास मिळाली. अख्खी महसूल व नगरपालिका यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सज्ज असताना, शहरातील पाणीबाणीची स्थिती दुर्लक्षित झाली आहे.कोरोनाच्या दाहकतेपुढे उन्हाळ्याच्या दाहकताही जाणवत नसल्याचे चित्र असताना, शहरातील अनेक गृहिणींना भर उन्हात नळाचे पाणी भरावे लागत आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत अनेक गृहिणी रखरखत्या उन्हात पालिकेच्या सार्वजनिक नळावर पाणी भरत आहेत.नगर परिषदेमार्फत दिवसाआड शहराला एक तास पाणीपुरवठा होतो. परंतु, भर दुपारी नळ सोडले जातात. काही भागात महिलांना सकाळी घरातील कामे करून दमल्यानंतर भर उन्हात पुन्हा पाणी भरण्याच्या दिव्यास सामोरे जावे लागते. याविषयीची पाणीपुरवठा कर्मचारी यांच्याशी संपर्क केले असता, दिवसभरात संपूर्ण शहराला तासभर पाणीपुरवठा करावा लागत असल्याने दिवसभरात प्रत्येक तासाला नळ सोडावेच लागत असल्याचे त्यांनी सांगितले.शहरातील महारूद्रनगर, नेहा कॉलनी अशा अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे. शहरातील काही भागातील पाइप लाइन नादुरुस्त असल्याने पाण्यासाठी ओरड होत आहे. दुसरीकडे नगर परिषदेचे कर्मचारी कोरोनाच्या लढाईत व्यस्त असल्याने पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही यानिमित्त पाहायला मिळत आहे.भर उन्हात पाणी भरणे त्रासदायक आहे. चार दिवसांनंतर आपण पाणीपुरवठा करीत आहोत. त्यामुळे दिवसभर पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात बदल केल्यास पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडेल.-वैभव गायकवाड, नगरसेवकसध्याच्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकाची माहिती घेते आणि भर दुपारी न सोडता त्यात काही बदल करता येईल का, यासंदर्भात कर्मचाऱ्यांशी चर्चा करून वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करू.-मेघना वासनकर मुख्याधिकारीभर दुपारी उन्हामध्ये पाणी भरणे हे दिव्यच आहे. पाणीपुरवठा सभापती या महिला आहेत. त्यांनी महिलांचा प्रश्न समजून घेऊन उन्हाची वेळ टाळून पाणीपुरवठा करणे गरजेचा आहे.-बच्चू वानरे, नगरसेवक

टॅग्स :water shortageपाणीकपात