शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अचलपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण

By admin | Published: January 16, 2016 12:23 AM

भाजपची दिल्लीपासूनची गटबाजी आता गल्लीबोळापर्यंत पोहोचली आहे. अचलपूर तालुक्यातही फारशी वेगळी स्थिती नाही.

लाल दिव्याची प्रतीक्षा : कणखर नेतृत्वाची गरजअचलपूर : भाजपची दिल्लीपासूनची गटबाजी आता गल्लीबोळापर्यंत पोहोचली आहे. अचलपूर तालुक्यातही फारशी वेगळी स्थिती नाही. दमदार नेतृत्त्व मिळाल्यास भाजपाची ही गटबाजी दूर होऊ शकते. त्यासाठी एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद किंवा लाल दिवा या तालुक्याला मिळायला हवा. अचलपूर-परतवाडा ही जुळी नगरी अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, बहुजन समाज पक्ष, प्रहार या पक्षांचेदेखील प्राबल्य आहे. यापैकी बहुतांश पक्षांमध्ये गटबाजीला ऊत आला आहे. पदांसाठी कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू असते. कोण कोणाला कसे बाद करतो यासाठी सतत डावपेज आखले जातात. या गटबाजीमुळेच कोणतेही नवीन नेतृत्त्व तालुक्यात उदयास येत नाही. भाजप-सेना युतीच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाले. विधानसभा निवडणुकांना वर्ष लोटले. परंतु वर्षभरानंतरही निवडणुकीच्यावेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली गेली नसल्याने प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. पक्षाजवळ कार्यकर्त्यांची फळी आहे. जिल्हास्तरीय पदाधिकारीही आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अचलपूर तालुक्याला विनायकराव कोरडे यांच्यानंतर विधानसभेत सत्ता मिळाली नाही किंवा लाल दिव्याची गाडीही मिळाली नाही. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा सहकार राजकारणात भाजपला अजूनही पाय रोवता आले नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यकारी सोसायटी, अमरावती जिल्हा को-आॅप. बँक आदी सहकारी संस्थांच्या सत्तेचा स्पर्शही भाजपला झालेला नाही. तरीही येथे भाजपा विजयश्री मिळाली. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद किंवा कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर महत्त्वाचे पद मिळावे, अशी अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)