शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्रामीण रस्ते विकासकामांचे नियोजन वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 01:10 IST

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी ४५ कोटींचे नियोजन केले. त्यानुसार कामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ग्रामीण भागातील विकासकामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी ४५ कोटींचे नियोजन केले. त्यानुसार कामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू आहे. परंतु, नुकत्याच पार झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये दोन राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांमध्ये जुंपल्याने आता जिल्हा परिषदेचे ४५ कोटींचे नियोजन वांध्यात येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत.आर्थिक वर्ष मावळण्यास आता आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. या भीतीपोटी अधिकारी-पदाधिकारी आता खडबडून जागे होत. मागील आॅक्टोबर महिन्यात पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामासांठी लेखाशीर्ष ५०-५४ इतर जिल्हा अंतर्गत १३ किलोमीटरचे नवे रस्ते आणि ५२ किलोमिटर डांबरीकरण यासोबतच ८ लहान पुलांच्या कामांचे नियोजन केले आहे. याशिवाय ३०-५४ या लेखाशीर्षांतर्गत ग्रामीण रस्ते कार्यक्रमात कामांचे नियोजन करून आमसभेची मंजुरीही दिली आहे. बांधकाम विभागाने तब्बल ४६ कोटी रुपये खर्च करून किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरण व पूल बांधकामाचे नियोजन केले आहे. जवळपास १६५ किमीचे रस्ते व ४३ लहान-मोठ्या पुलांची कामे सुरू आहेत. लेखाशीर्ष ५०-५४ इतर जिल्हा अंतर्गत १३ किमीचे नवे रस्ते आणि ५२ किमी डांबरीकरण केले जाणार आहे. ८ लहान पुलांचे कामांवर १८.८० कोटींचा निधी खर्च केला जाईल. ३०-५४ या लेखाशीर्षांतर्गत ग्रामीण रस्ते कार्यक्रमात २९ किमीचे नवीन रस्ते आणि ७० किमीचे डांबरी रस्ते व लहाने-मोठे मिळून ३५ पुलांच्या कामासाठी २७.२१ कोटींच्या निधीतून जिल्हा रस्ते मजबुतीकरणाची कामे होणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ४५ कोटींपैकी तूर्तास २७ कोटी प्राप्त झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीत झेडपी पदाधिकारी व सतारूढ राजकीय पक्षात झालेल्या वादामुळे डीपीसीकडून विकास कामासाठी निधी मिळणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. राजकीय मतभेदामुळे हा निधी झेडपीला मुदतीत मिळाला नाही, तर विकासकामे खोळंबतील. परिणामी जि.प.चे नियोजन मार्गी लागणार की, कोलमडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ६ आॅक्टोबरच्या सभेतील ठराव क्र.२५ मध्ये लोकपयोगी लहान कामे (२५-१५) या लेखाशिर्षांतर्गत ४.९३ कोटींच्या दीडपट म्हणजेच ७.४० कोटींंच्या कामांचे नियोजन सत्ताधाºयांनी केले. त्यानुसार या सभेत मंजूर देण्यात आली. मात्र ठराव क्र. २५ वर विरोधी पक्षाच्या सदस्या सुहासिनी ढेपे, विरोधीपक्ष नेता रवींद्र मुंदे आदींनी यावर आक्षेप घेतला. या नियोजनावर सीईओ आणि कॅफोच्या स्वाक्षºया नसल्याने विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सदर नियोजनानुसार कामांच्या यादी सभागृहात ठेवली नसल्याचा आक्षेप नोंदविला आहे. आयुक्तांनी यावर मुख्यकार्यकारी अधिकारी व मुख्यलेखा व वित्त अधिकारी यांच्या शिफारसीसह आगामी सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.विकासकामांचे नियोजन केलेले आहेत. त्यानुसार प्रशासकीय काम सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्याने नियोजनाबाबत निश्चित काही सांगता येणार नाही.- मनीषा खत्री,मुख्यकार्यपालन अधिकारीविकासकामांचे नियोजन पीसीआयप्रमाणे समन्वयातून मंजूर केले. या विकासकामांना निधीही मिळेल जर निधी मिळाला नाही तर शेवटी ग्रामीण भागाच्या विकासाचे नुकसान होईल.- जयंत देशमुख,सभापती, बांधकाम समिती

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक