शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

जुलैमध्ये होणार दोन कोटी वृक्ष लागवड

By admin | Published: April 06, 2016 12:12 AM

राज्यातील कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण व त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी राज्यभरात वन महोत्सवाचे औचित्य साधून १ जुलै रोजी ...

वन महोत्सवाचे औचित्य : जिल्ह्याला १५ लाखांच्या उद्दिष्टांची शक्यताअमरावती : राज्यातील कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण व त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी राज्यभरात वन महोत्सवाचे औचित्य साधून १ जुलै रोजी या एकाच दिवशी तब्बल दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण व वनविभागाकडून दीड कोटी तर इतर शासकीय विभागाकडून ५० लाख रोपे लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचे नियोजन करून २० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल व वनविभागाने दिले आहेत. राज्यातील वनाच्छादित क्षेत्राची वाढ होण्यासाठी विविध वृक्षरोपणाच्या योजना राबविल्या जात आहेत. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांची लागवड केली जात असली तरी यामध्ये संस्था, प्रशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी उद्योजक, स्थानिक स्वराज संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्याचे नियोजन आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तालुका व गावपातळीवर समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्षांनी नियमित बैठका घेऊन योजनेचे नियोजन करायचे आहे. रोपांची उपलब्धता रोपे लागवडीच्या जागा, लागवडीसाठी खड्डे खोदले त्यासाठी लोकसहभागातून उपलब्ध होणाऱ्या निधीची निश्चित करून अहवाल नियमित सादर करावयाच्या सूचना दिल्या आहेत. दोन कोटी वृक्षांच्या उद्दिष्टांपैकी अमरावती जिल्ह्याला १२ ते १५ लाखांचे उद्दिष्ट मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)