शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

केंद्र सरकारचे धोरण देशाला अधोगतीकडे नेणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 20:34 IST

Amravati News केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला.

ठळक मुद्देशिक्षण, आरोग्य कृषी क्षेत्रातील खासगी क्षेत्राचा प्रभाव गंभीर

अमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रात होत असलेला खासगी क्षेत्राचा शिरकाव ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकारचे ते धोरण देशाला अधोगतीकडे नेणार असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केला. त्या बुधवारी अमरावती येथे ‘मीट द प्रेस’मध्ये बोलत होत्या. (Medha Patkar)

             शिक्षण, आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर गत काही वर्षात खासगीकरणाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबाबत सरकारने जी जबाबदारी घ्यायला हवी होती, ती घेतली जात नाही. कोरोना संकटकाळात केंद्र सरकारकडून ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता असताना राज्य सरकारला पाहिजे तशी मदत झाली नाही. सरकारने विमानतळ, बँकिंग या क्षेत्रात खासगीकरण केले आहे. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत मोदी सरकारने तीन शेतकरी विरोधी कायदे पारित केलेत. शेती क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे देशाची स्थिती दक्षिण आफ्रिकेसारखी होणार आहे. अन्न सुरक्षा योजनेचेही वाटोळे करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला.

२७ सप्टेंबरला बंदची हाक

केंद्रसरकारने उद्योगपतींचे हित जोपाण्यासाठीच तीन कृषी कायदे आणले आहेत. यामुळे शेती क्षेत्रात होणाऱ्या खासगीकरणामुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे किसान समन्वय समितीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. यात जास्तीत शेतकरी, शेतमजूर, कामगार व अन्यही संघटनांनी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. विद्यमान राज्यपालांची भूमिका ही राजकीय असल्याची मेधा पाटकर म्हणाल्यात.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकर