शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

अनुदानावरील फळबाग योजनांसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:09 AM

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन; दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ. चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला ...

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन;

दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ.

चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला सलग फळबाग लागवडसह, बांधावरील वृक्ष लागवड, फुलपिके लागवड, नाडेप कंपोस्ट, गांडूळ खत, विहीर पुनर्भरण इत्यादी योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी अनुदानावरील फळबागसह इतरही योजनांच्या

लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावे, असे तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड,यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.

सदर योजना ही फक्त दोन हेक्टर क्षेत्रधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जाॅबकार्ड, माती, पाणी परीक्षण अहवाल, ग्रामसभेचा ठराव, ७/१२, ८/अ, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अल्प, अत्यल्प शेतकरी घेऊ शकतात, तसेच अनुचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, यांचा योजनेसाठी प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.

फळबाग लागवडकरिता संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू, इत्यादींना अनुदान देण्यात येईल, तसेच बांधावरील लागवडीसाठी सांग, बांबू, शेवगा, कडूनिंब, सोनचाफा बोर, सीताफळ, आवळा, आंबा, इत्यादींना अनुदान देय असेल. त्याचप्रमाणे फुलपिकामध्ये निशिगंध, गुलाब, मोगरा, यासाठी अनुदान देण्यात येईल. कंपोज खत व गांडूळ खताच्या प्रत्येकी एका युनिटसाठी ११ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. विहीर पुनर्भरणकरिता १४ हजार रुपये अनुदान देय असेल. तरी निकषात बसणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर, आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.

प्रस्ताव सादर करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी, संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूरबाजार यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून परदेस नोटमध्ये कळविण्यात आले आहे.

(कमी पावसात पेरणी करू नका. सध्या तालुक्यातील काही भाग वगळता, अन्य ठिकाणी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरी तालुक्यातील ज्या भागात कमी पाऊस झाला आहे, येथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. आपल्या परिसरात ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. -- तालुका कृषी विभाग.चांदूर बाजार.)