शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अवकाळीचा १७.५२ कोटींचा निधी उपलब्ध

By admin | Published: March 22, 2016 12:30 AM

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ या कालावधीत गारपीट व अवराळी पावसामुळे शेती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष पॅकेजअंतर्गत शासनाने १७ कोटी ५२ लाखांचा निधी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला वितरित केला आहे. हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या कालावधीत जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामध्ये ७० हेक्टरमधील भात, ५ हजार ८०६ हेक्टरमधील कपाशी, १० हजार ४१ हेक्टरमधील सोयाबीन, १६ हजार ५४२ हेक्टरमधील तूर, ३ हजार १४५ हेक्टरमधील मूग व उडीद, ६५.४९ हेक्टरमधील ज्वारी व १८६ हेक्टर मधील इतर पिके बाधित झाली, असे एकूण ३५ हजार ८२८ हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. तसेच फळपिकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी, असे १ हजार ११७ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले होते. यासाठी शासनाद्वारा प्रचलित दरापेक्षा अधिक दराने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या एप्रिल ते जून मधील नुकसानीसाठी मदतयंदा एप्रिल ते जून महिन्यात वादळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यातील थोड्या प्रमाणात शेती पिके व फळपिके यांचे नुकसान झाले होते. यामध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाने शुक्रवारी ३ लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यास उपलब्ध केला आहे. लवकरच तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मिळणार दिलासासन २०१४-१५ मधील अवकाळी पावसाने ग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाही शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस व गारपिटीने घाला घातला आहे. त्यामुळे पार मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हा निधी आधार देणारा ठरेल. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होईल.