शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

युती सरकारला खाली खेचा

By admin | Published: April 03, 2016 3:49 AM

दुष्काळासाठी आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी शासकीय तिजोरी उघडली होती.

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्यचांदूरबाजार : दुष्काळासाठी आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी शासकीय तिजोरी उघडली होती. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा डेपो उघडले होते परंतु सत्तारुढ युती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय न घेता त्यांच्या जखमांना मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते शनिवारी येथे बोलत होते. स्थानिक लंगोटे मंगल कार्यालयात आयोजित अचलपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकरावजी ठाकरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र महिला प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस होत्या तर प्रमुख उपस्थितीत आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, राज्य सरचिटणीस संजय खोडके, रामकिसन ओझा, जि. प. अध्यक्ष सतीश उईके, जिल्हा महिला काँग्रेसची अध्यक्षा छाया दंडाळे, माजी आमदार सुलभा खोडके हे होत्या.पुढे बोलताना उद्घाटक व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मराठवाड्याचा शेतकरी मदतीसाठी दारोदारी फिरला व शेवटी मंत्रालयासमोर आत्महत्या केली. त्यावरून हे सरकार किती निष्ठूर आहे, हे सिद्ध होते. मराठवाड्याप्रमाणेच अमरावती विभागात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मात्र सरकारला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी जायलाही वेळ नाही. राज्यात बागायती जमीन ११ टक्केच आहे तरीही या सरकारने सिंचनासारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने यावर्षीच्या बजेटमध्ये केवळ ३ टक्केच वाढ केली आहे. त्यामुळे सरकारकडे पैसा नसेल तर वाटेल तितके कर्ज काढा. मात्र शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सोडवा व शेतकऱ्यांचा ७/१२ सुद्धा कोरा करा, अशी मागणी यावेळी केली.सरकारचे आश्वासन खोटेचांदूरबाजार : खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारला जनता लवकरच आपली जागा दाखवून देणार आहे, हे नुकत्याच संपन्न झालेल्या गुजरात व बिहार येथील निवडणुकीतून दिसून आले आहे, असे मत महिला प्रदेश अध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.शासनाच्या उदासीन धोरणामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळ, नापिकीमुळे तसेच गारपिटीमुळे आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केले. यावेळी आमदार वीरेंद्र जगताप यांनीसुद्धा विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माणिकराव ठाकरे म्हणाले की, अमरावती विभागात यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. त्यामागील कारण या भागात सतत पडलेला दुष्काळ असून शेतकऱ्याला आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे, असे असताना हे सरकार केवळ आश्वासनांचा भडीमार करीत आहेत. कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष किशोर किटुकले, शहर अध्यक्ष भाष्कर हिरडे, किशोर देशमुख, समिर देशमुख, जवाभाई, राजाभाऊ टवलारकर, कैलाश आवारे, मीनल देशमुख, नलिनी हुड, बाबुराव जवंजाळ, नीळकंठ चव्हाण, हरिीचंद्र अग्रवाल, रावसाहेब छापानी, अनंत साबळे, बाबुभाई इनामदार, शिवाजी बंड, अरविंद लंगोटे, नाजीम बेग, हरीदास नाथे, प्रवीण वाघमारेसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मंगेश देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन किशोर किटुकले यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)देशमुखांच्या आक्रमक भाषणाने नेतेही झाले अवाक्काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या आक्रमक भाषणाने उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवीन स्फूर्ती निर्माण झाल्याचे दिसत होते. यावेळी बबलू देशमुखांच्या समर्थनार्थ सूरू असलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृह दणाणले होते. हे बघून काँग्रेसचे नेतेसुध्दा आवक् झाले होते.