शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

‘शहानूर’च्या सिंचनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:23 PM

अंजनगाव-दर्यापूर या मुख्य शहरांसह दोन्ही तालुक्यांतील अडीचशे गावांना पाणीपुरवठा करणाºया शहानूर धरणाची सिंचनक्षमता यंदा बाधित झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : उपसा जलसिंचन योजनांचे भविष्य अंधारात

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अंजनगाव-दर्यापूर या मुख्य शहरांसह दोन्ही तालुक्यांतील अडीचशे गावांना पाणीपुरवठा करणाºया शहानूर धरणाची सिंचनक्षमता यंदा बाधित झाली आहे. आॅगस्टमध्येसुद्धा अर्धेच भरलेल्या या धरणात परतीच्या दमदार पावसामुळे सध्या ६८ टक्के पाणी साठा आहे. या धरणातून यंदा सिंचनाला पाणी द्यावे की नाही? या दुविधेत वरिष्ठ अधिकारी अडकले आहेत.जिल्ह्यातील इतर धरणांच्या रबी हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असताना शहानूर धरणाच्या सिंचनासाठी अजूनही जाहिरनामे काढण्यात आलेले नाहीत. यावरून यंदा धरणाच्या सिंचनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांना याबाबत विचाराणा केली असता हा मुद्दा अजूनही चर्चेसाठी साहेबांच्या टेबलावर असल्याचे सांगण्यात आले आहे.सिंचन अभियंत्यांच्या अहवालानुसार या धरणाची सिंचनक्षमता धरण पूर्ण भरले असताना १० हजार हेक्टर एवढीच आहे. मात्र धरण निर्मितीपासून आजपर्यंत महत्तम एक हजार ५०० हेक्टर ओलीत केले गेले. कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने दिलेले पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते म्हणून आमदार बुंदिले यांनी पाईपलाइनने पाणी देण्याची योजना सादर केली. मात्र ही योजना उजव्या कालव्यावर सविस्तर वितरिकेद्वारा नियोजित आहे. या योजनेला जलसंपदा मंत्रालयाने रेंगाळत ठेवून डाव्या वितरिकेद्वारा पाईपलाइनने पाणी देणाºया दोन खासगी उपसा जलसिंचन योजनांना नाहरकत पत्र दिले आहे.शेतकरी झाले पाणीपट्टीसाठी कर्जदार...: एका प्लास्टिक पाईप कंपनीने जानेवारी २०१५ व फेब्रुवारी २०१७ मध्ये पाच-पाच कोटी रूपयांचे कर्ज देऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनीचे गहाणखत केले. शहानूर धरणाची सिंचन क्षमता बाधित झाल्याने सध्या तूर्त या दोन्ही उपसा सिंचन योजना पाण्यापासून वंचित झाल्या आहेत आणि दोन्ही संस्थामधील शेतकरी १० कोटी रूपयांच्या कर्जात व व्याजात अडकले आहेत.अनेक प्रश्न अनुत्तरितपाणीपुरवठा व जलसिंचन विभागातील बेजबाबदार अधिकारी शहानूरच्या सिंचन व्यवस्थेचे नियोजन अजूनही करू शकले नाहीत, हे वास्तव आहे. यावर्षीची आपत्ती नैसर्गिक असली तरीही या तालुक्यातील शेतकºयांना उपसा जलसिंचनाचे गाजर दाखवून १० कोटी रुपयांच्या कर्जात अडकविणारे अधिकारी कोण आहेत? शासकीय खर्चाने प्रस्तावित पाणीपुरवठा योजना का रेंगाळत ठेवली? यावर्षी धरणातून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल का, असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.शहानूर धरण गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा ती परिस्थिती नाही. पुढील उन्हाळा किती तीव्रतेचा राहील याचा अंदाज घेऊनच सिंचनाबाबत निर्णय घेण्यात येईल. हा मुद्दा वरिष्ठ अधिकाºयांच्या टेबलवर असल्याने सिंचनाबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही.- सचिन हिरेकर,शाखा अधीक्षक, शहानूर कालवे उपविभाग