शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 18:10 IST

प्रकल्प उभारणीसाठी अजूनही दीड वर्ष लागणार, बेरोजगार युवकांना रोजगाराची प्रतीक्षा

श्यामकांत सहस्रभोजने

बडनेरा (अमरावती) : बडनेरातील बहुप्रतिक्षीत रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यात ट्रायल बेसिसवर डबे तसेच चाकांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून या कारखान्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजूनही या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दीड वर्षाची प्रतीक्षा लागणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नाने बडनेरा ते काटआमला मार्गावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना उभारण्यात आला आहे. २०० एकरात याचे काम सुरू असून, ३०० कोटींपेक्षा जास्त रकमेतून हा प्रकल्प साकारला जात आहे. मोठा तसेच रोजगारांची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प नावारूपास येत आहे. प्रारंभी या प्रकल्पाच्या निर्मितीत संथगती होती. जमीन हस्तांतरणाला शेतकऱ्यांकडून बराच अवधी लागला. तर कोरोनात मजुराअभावी काम ठप्प होते. प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या कंपन्यांचा वेळकाढूपणा देखील दिरंगाईस कारणीभूत आहे. गत वर्षभरापासून येथील कामाला गती मिळाली आहे. हा कारखाना सुरू होण्याबाबत अनेकदा तारखा देण्यात आल्या. प्रत्यक्षात अजूनही दीड वर्षांची प्रतीक्षा लागणार आहे. मध्यंतरी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे वॅगन कारखान्याची पाहणी करून या प्रकल्प पूर्णत्वासासाठी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या होत्या, हे विशेष.

कोच तसेच चाकांच्या दुरुस्तीला सुरुवात

गेल्या दीड महिन्यापूर्वी या कारखान्यात कोच तसेच रेल्वे गाड्यांची चाके त्याचप्रमाणे इतरही कामांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. कुर्डुवाडी, भुसावळ, नागपूर विभागातून या ठिकाणी कोच तसेच चाके दुरुस्तीसाठी आली आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम झपाट्याने सुरू आहे. रेल्वे डबे, चाकांच्या दुरुस्तीची कामे वेगाने होत आहेत.

अद्यापही बरीच कामे बाकी

हा कारखाना उभारणीला प्रत्यक्षात २०१७ पासून सुरुवात झाली. मात्र काही तांत्रिक अडचणी, मंत्रालयातील दिरंगाई, मनुष्यबळाचा अभाव, कोरोना काळात कामे ठप्प अशा एक ना अनेक कारणांनी या प्रकल्पाची कामे अत्यंत संथगतीने सुरू झाली. खरे तर कोरोनानंतर या कारखान्याच्या सभोवतील संरक्षण भिंत उभारण्यात आली. पाण्याच्या टाकीचे काम झाले. मात्र अंतर्गत रेल्वे ट्रॅक, शेडची कामे काहीशी बाकी आहे. परिसरात मुरूम भरून लेवल करण्याचे काम सध्या सुरू आहे. रस्ते तसेच इतरही बरीच कामे अद्याप होणे बाकी आहे.

दीड हजार लोकांना मिळू शकतो रोजगार

हा कारखाना पूर्णपणे सुरू झाल्यानंतर येथील कामासाठी जवळपास दीड हजार लोकांना रोजगार मिळू शकतो. स्थानिकांना या कारखान्यात प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे, असे शहरवासीयांमध्ये सुरुवातीपासूनच बोलले जात आहे. रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या माध्यमातून एक चांगली रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याकरिता बेरोजगार युवकांना प्रतीक्षा आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेBadneraबडनेरा