शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

रतन इंडियातील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे

By admin | Published: April 08, 2016 12:10 AM

पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून...

गुरुवारी निघाला तोडगा : १५ दिवसांचा अवधी अमरावती : पगारवाढीमध्ये भेदभाव करून प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या रतन इंडिया कपंनीच्या धोरणाविरोधात अडीचशे कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुकारलेला बंद गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मागे घेण्यात आला. रतन इंडियाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष कर्नल लोकेशसिंग आणि हिमांशू माथूर यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांची गुरुवारी बैठक पार पडली. त्यात १५ दिवसांच्या आत आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. गुरुवारी रतन इंडियामध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक कामगारांनी अमरावती येथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर रतन इंडियाचे व्यवस्थापन हादरले व त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मध्यम मार्ग निवडण्यात आला. परप्रांतीयांविरुद्ध प्रकल्पग्रस्त असा सामना सध्या रतन इंडियात रंगला आहे. काम सारखेच मात्र दाम वेगवेगळे असून परप्रांतीयांना पगारवाढ तर प्रकल्पग्रस्तांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. द्वेषभावनेतून वारंवार प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत असून या अन्यायाविरोधात १३० प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.मार्च महिन्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करण्यात आली. मात्र प्रकल्पग्रस्त व इतर स्थानिक कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न केल्याने कर्मचाऱ्यांनी कर्नल लोकेशसिंग यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी सकारात्मक उत्तर न दिल्याने नाईलाजाने कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. कर्मचाऱ्यांनी बंदची घोषणा करताच रतन इंडियाच्या अधिकाऱ्यांनी कामगार अधिकारी जाधव यांनादेखील पाचारण करण्यात आले व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कामगार अधिकारी यांनी येथे का बोलावले म्हणून कर्मचाऱ्यांशी वाद घातला. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशाची अवहेलना करण्याचा प्रकार रतन इंडियाने केला, असा आरोपही यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. नियमाप्रमाणे पगारवाढ व्हावी, प्रकल्पग्रस्तांना मिळणारी सापत्न वागणूक टाळावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांची असून १५ दिवसांच्या आत यावर तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रफुल्ल तायडे, सचिन चेंडकापुरे, विनोद पांडे, देवानंद इंगोले, राजेश बारबुद्धे, अमोल इंगळे, राहुल नाकाडे, गोफणे यांच्यासह अडीचशे कर्मचाऱ्यांनी रतन इंडियाला दिला आहे. (प्रतिनिधी)