शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

बच्चू कडूंसोबतचा वाद आता संपलेला आहे - रवी राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2022 4:18 PM

बच्चू कडू यांच्या भाषणानंतर रवी राणांची प्रतिक्रिया

अमरावतीमाझा बच्चू कडूंबोसतचा वाद आता संपलेला आहे. लोकशाहीत असं घडत असतं, असे विषय संपवून पुढे जायला हवं असं आमदार रवी राणा म्हणाले. शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न, बेरोजगारीसंबंधी प्रश्नासाठी आता काम करायचयं, असंही त्यांनी नमूद केलं. आज अमरावतीत प्रहार संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आज प्रहारच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यासंदर्भात आपली भूमिका मांडली. पहिली वेळ आहे म्हणून माफ केलं पुढच्यावेळेस माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रहार हा काही आंडूपाडूंचा पक्ष नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोथळा काढतो, असंही कडू म्हणाले. 

Bachchu Kadu: मै झुकेगा नहीं! पहिली वेळ होती, पण पुन्हा माफी नाही; बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

"रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा कामात वाया घालवायची नाही. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू", असं बच्चू कडू म्हणाले. 

यानंतर, रवी राणा यांनी आमच्यातील वाद आत संपला असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या विरोधात ५० उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले. तरी जनता माझ्यासोबत आहे. जनेतेचा आशिर्वाद ज्याच्यावर असतो, तोच जिंकून येतो असंही रवी राणा म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवि राणाBacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती