शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापली तर फटके मारू, रविकांत तुपकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 20:31 IST

सोयाबीनची आयात थांबविण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी आंदोलन...

अमरावती - विदर्भात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून अतिपावसाने ते खराब झाले आहे. कापसाचे पीकही हातातून गेले आहे. उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले आहे. ती तूट भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात कृषीपंपाची वीज कापण्यास येणाऱ्या अधिकाऱ्यांना फटके मारू, असा निर्वाणीचा इशारा शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रविवारी दिला. ते पत्रपरिषदेत बोलत होते.

१२ नोव्हेंबर रोजी आंदोलन -यंदा सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकरी उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पादन झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यांना विम्याची रक्कम खात्यात जमा करा, सोयाबीनची आयात थांबवा, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवा व संत्रा उत्पादकांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या. अशा मागण्या करत शेतकरी स्वाभिमान संघटनेतर्फे १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

शेतकरी नापिकीमुळे मृत्यूला कवटाळत असताना विधानसभेत शेतकऱ्यांचे हे गहण प्रश्न मांडण्याऐवजी लोकप्रतिनिधी ड्रग्सप्रकरणी अटक केलेल्या आर्यन खानच्या मुद्द्यावर चर्चा करतात, हे कृषिप्रधान देशासाठी निंदनीय असल्याचे तुपकर म्हणाले. दरम्यान वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आहेत, पण ते शेतकऱ्यांचा मुद्दा कधीच मांडत नाहीत, या प्रसार माध्यमांच्या प्रश्नावर तुपकर यांनी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे येत्या काही दिवसात यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील, असे स्पष्ट केले.

यावेळी शेतकरी संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, अमित अढाऊ, रवि पडोळे, मंगेश फाटे, शैलेश ढोबळे, भगवंत वानखडे, अमोल महल्ले, श्याम अवथळे (बुलडाणा), दयाल राऊत (नागपूर), संकेत दुरकर, अरुण लाड, पुरुषोत्तम बन्सोड, प्रशांत शिरभाते, दिनेश आमले आदी उपस्थित होते.

दोन्ही सरकारला दखल घेण्यास भाग पाडू -शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून शेतीत घाम गाळला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे लावलेला उत्पादनखर्चही निघू शकला नाही. परिणामी मृत्यूला कवटाळण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, ज्याने आपल्यावर मरायची वेळ आणली त्याला मारायचे आहे. त्यासाठीच १२ नोव्हेंबर रोजी राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले आहे. याची दखल केंद्र आणि राज्य सरकारला घेण्यास भाग पाडू, असे ठामपणे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी