शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
2
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
3
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
4
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
5
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
6
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
7
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
8
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
9
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
10
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
11
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
12
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
13
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
14
Jio, Airtel, Vi चे रिचार्ज प्लॅन्स होऊ शकतात स्वस्त, सरकारकडे केली मागणी; काय आहे प्रकरण?
15
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
16
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
17
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
18
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
19
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
20
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

लढवय्या नेतृत्वाची पुन्हा सिद्धता!

By admin | Published: September 07, 2015 11:59 PM

प्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे ...

गणेश देशमुख अमरावतीप्रतिष्ठेची ठरलेल्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या महिला आमदार यशोमती ठाकूर यांनी संपादन केलेल्या चमकदार यशामुळे त्यांच्या लढवय्य नेतृत्त्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. तालुका पातळीवरील बाजार समिती निवडणुकीचे स्वरुप एरवी लहान असले तरी तिवस्यात मात्र ही निवडणूक दिग्गजांची होती. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर विरुद्ध भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, सीपीआय हे पक्ष एकवटले होते. प्रहार पक्षातून निष्कासित झालेले संजय देशमुख यांनी यशोमतींच्या पराजयासाठी जसे उत्साही प्रयत्न केलेत, यशोमतींचे जावई सत्यजित निंबाळकर हेही तसेच यशोमती विरोधकांचे ऊर्जास्त्रोत बनून तिवस्यात डेरेदाखल होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबलू देशमुख हे त्यांच्या अचलपूर या गृहतालुक्यातील निवडणुकीत व्यग्र होते. तथापि, यशोमतींना डावलण्याची कुठलीही संधी गमावणे त्यांच्या स्वयंसंहितेविरुद्ध असल्याने तिवसा तालुक्यात 'पंजा'वर 'बाण' मारून 'कमळ' फुलविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न त्यांनी केलेत. एका महिला नेतृत्त्वाविरुद्ध स्वकीय-परकियांनी अशी अभेद्य राजकीय भिंत उभारल्यावर तिची मजबुती लोकमनांवर बिंबविण्यासाठी दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तिवसा तालुक्यात प्रचाराला नेले गेले. त्या दोन्ही पालकमंत्र्यांचा प्रभाव किती, हा मुद्दा स्वतंत्रपणे चर्चिला जावा, असा असला तरी नामदारांच्या शासकीय, प्रशासकीय 'वजना'चा अन् लाल दिव्यांचा प्रभाव ग्रामीण मनांवर पाडण्यासाठीचाच तो सर्वोच्च प्रयत्न होता. बंजारा मते वळविण्यासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि मराठा मतांवर छाप पाडण्यासाठी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना तिवस्यातील निवडणुकीत प्रचाराचा आग्रह धरण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत पार पडलेल्या चार बाजार समिती निवडणुकांपैकी केवळ तिवसा या एकमेव तालुक्यात दोन पालकमंत्री प्रचारासाठी गेले. तथापि, यशोमतींची छबी या दोन्ही नामदारांच्या छबीपेक्षाही प्रभावी ठरली. काँग्रेस पक्षाच्या धाटनीत नेतृत्वगुणांना मजबुती मिळाली असतानाही यशोमती ठाकूर या आक्रमक नेतृत्वासाठी ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी, नेत्यांनी ठरवून त्यांच्याविरुद्ध एकी केली होती. भगवी लाट, विरोधकांची हातमिळवणी आणि रक्ताच्या नात्यांनी केलेला दगा या घटना अपयश खुणविणाऱ्याच होत्या. चित्र असे भेसूर असतानाही आत्मविश्वास ढळू न देता, आक्रमकतेला संयमाची जोड देऊन यशोमतींनी विरोधकांचा जो धुंव्वाधार सफाया केला. त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीतही बघायला मिळाली. विरोधाची कारणे द्यायला यशोमतींच्या विरोधकांना जसे त्यावेळी तोंड नव्हते, तसेच यावेळीही ते नाही!