शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

लोकप्रतिनिधी , अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे

By admin | Published: January 14, 2016 12:14 AM

भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ....

आढावा बैठक : विशेषाधिकार समिती प्रमुख नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादनअमरावती : भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार प्रदान केले आहेत. त्यानुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक देवून समन्वयाने कार्य करावे, असे प्रतिपादन समिती प्रमुख आ. नीलम गोऱ्हे यांनी केले. विधान परिषद विशेषाधिकार समितीची अमरावती विभागस्तरीय बैठक व कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना विभागीय आयुक्त कार्यालयात त्या बोलत होत्या.बैठकीला अप्पर मुख्य सचिव पी.एस. मिना, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, उपसचिव नंदलाल काले, अवर सचिव उमेश शिंदे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते तसेच विभागातील जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जी.श्रीकांत, विजय झाडे , राहुल द्विवेदी तसेच सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिकेचे आयुक्त, मुख्याधिकारी, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शासन सर्वसामान्य जनतेसाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी जनतेची गाऱ्हाणी ऐकून विकास कार्य करत असतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकटीत काम करावे लागते. बऱ्याच प्रकरणात हक्कभंगाची प्रकरणे निर्माण होतात, यासाठी नेमका हक्कभंग कशासाठी होतो, विशेषाधिकार कशासाठी आहे, याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यावेळी समिती प्रमुखांनी विभागातील अधिकाऱ्यांना विशेषाधिकाराबाबत दिशानिर्देश दिले.(प्रतिनिधी)घटनात्मक तरतुदीची दिली माहितीविशेषाधिकारासंदर्भात असणाऱ्या घटनात्मक तरतूदीचे पॉवर पॉईंटद्वारे सादरीकरण उपसचिव नंदलाल काळे यांनी केले. यामध्ये विधिमंडळाची कार्यवाही व न्यायालये, सभागृहात भाषण स्वातंत्र्याचा विशेषाधिकार, भाषण स्वातंत्र्य व सभागृहाची कार्यवाहीबाबतचे विशेषाधिकार, इतर विशेषाधिकार, सदस्यांना अटकेपासून संरक्षण, विधिमंडळ सभागृहाच्या आवारात समन्स बजावणे, न्यायालयासमोर विधिमंडळ सभागृहाचे कागदपत्रे सादर करणे, विधानमंडळासमोर साक्षीसाठी उपस्थित राहणे, विशेषाधिकाराचा भंग याबाबत माहिती यावेळी देण्यात आली.मार्गदर्शक तत्त्वांचे तपशीलवार सादरीकरणसामान्य प्रशासन विभागाच्या २७ रोजीच्या परिपत्रकात विधानमंडळ, संसद सदस्यांना सन्मानाची व सौजन्याची वागणूक देणे, त्यांच्याकडून आलेले पत्र, अर्ज, निवेदनांना पोच देणे, त्यावर सत्वर कार्यवाही करणे, शासकीय कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना आमंत्रित करणे, त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर छापणे इत्यादीबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे तपशिलवार सादरीकरण यावेळी करण्यात आले.