शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

महानगरपालिकेत वाहतुकीची कोंडी

By admin | Published: March 22, 2016 12:31 AM

जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संबंध असलेल्या महानगरपालिकेत रोज शेकडो अभ्यागतांचे जा-ये राहते

दोन सुरक्षा रक्षक तैनात : वाहने अस्ताव्यस्त, नागरिक होतात त्रस्तमनीष कहाते अमरावतीजन्मापासून मृत्यूपर्यंतचा संबंध असलेल्या महानगरपालिकेत रोज शेकडो अभ्यागतांचे जा-ये राहते. एकर भरावच्या परिसरात वाहनांचे पार्किंग आहे. परंतु वाहनांच्या प्रमाणात पार्किंगची जागा अपुरी असल्याने दर मिनिटला वाहतुकीची कोंडी होते. येथे केवळ दोन सुरक्षा रक्षक तैनात आहेत. सात लाख लोकसंख्या असलेल्या महानगरपालिकेची स्थापना सन १९८३ साली झाली. उपनगरातील विविध कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे वाहन पार्किंगमध्ये उभे राहते. पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचेही वाहने येथे उभी केली जातात. पार्किंगची जागा तोकडी आहे. खुद्द महापौरांच्या वाहनाच्या अवतीभवती अनेक छोटी-मोठी वाहने पार्किंग केली जात आहेत. दोन सुरक्षा रक्षकांच्या जबाबदारीवर पार्किंग आहे. या दोन्ही सुरक्षा रक्षकांना दिवसभर वाहनधारकांना समजविण्यासाठी तत्पर रहावे लागते. प्रसंगी शाब्दिक चकमकही होते. हॅन्डल लॉक नसलेली वाहने इकडून तिडके सरकविण्याचे जिकरीचे कामही त्यांना करावे लागते. सकाळी १० वाजल्यापासून वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात होते. तसेच बाहेरील वाहनेसुद्धा पार्किंगकरिता येथेच येत असल्याचे सुरक्षा रक्षकांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची वाहने पार्किंगमधून बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अभ्यागतांना कामकाजानिमित्त येण्याकरिता वेळ ठरवून दिली तरच वाहतुकीची कोंडी सुटू शकते. याबाबत उपाययोजना सुरू आहे. - चंदन पाटील, उपआयुक्त, महानगरपालिका