शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

उन्हाच्या तडाख्याने रस्ते ओस

By admin | Published: September 10, 2015 12:08 AM

पावसाळा संपता-संपता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाऊस तर सोडाच उन्हाळासदृश उन्हाच्या झळांनी सद्यस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत.

आजार बळावले : शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले अमरावती : पावसाळा संपता-संपता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाऊस तर सोडाच उन्हाळासदृश उन्हाच्या झळांनी सद्यस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत. गत आठवडाभरापासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र, मंगळवारी उन्हाचा तडाखा वाढल्याचे जाणवले. प्रखर उन्हामुळे भर दिवसा रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. बुधवार सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी १२ नंतर उन्हाची दाहकता वाढत जाते. वाढत्या उन्हामुळे वर्दळीचे रस्तेही ओस पडल्याचे दिसून येते. उन्हाच्या काहिलीपासून रक्षण करण्याकरिता दुपट्टे आणि स्टोल्सचा वापर वाहनधारकांना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर विविध कारणांसाठी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो. प्रचंड उकाड्याने आबालवृध्द हैराण झाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत. कशीबशी हाताशी उरलेली पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर वाढत्या उन्हाचा विपरित परिणाम जाणवू लागला आहे. सोयाबीन ऐन फुलावर आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने शेंगा पोचट राहण्याची शक्यता अधिक आहे. भर पावसाळ्यात पिकांना सिंचनाचे पाणी द्यावे लागत आहे. वातावरणातील अनपेक्षित बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. तीव्र उन्हामुळे डोकेदुखी, डोळ्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातील कडक ऊन नागरिकांची अक्षरश: परीक्षा घेत आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी उपयायोजना करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)