शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
3
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
4
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
5
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलां! (VIDEO)
6
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
7
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
8
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
9
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
11
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
12
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
13
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
14
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
15
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
16
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
17
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
18
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
19
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
20
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा

आजपासून पावसाच्या रोहिणी नक्षत्राला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:13 AM

सोबतच आजपासून नऊ दिवस नवतपा मृगावर नजर : पान ३ ची लीड लोकमत न्यूज नेटवर्क चांदूरबाजार : ग्रह-ताऱ्यांवर ...

सोबतच आजपासून नऊ दिवस नवतपा

मृगावर नजर :

पान ३ ची लीड

लोकमत न्यूज नेटवर्क

चांदूरबाजार : ग्रह-ताऱ्यांवर आधारित नक्षत्रनिहाय पावसाचा अंदाज वर्तविणे, ही भारतीयांची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. भारतीय पंचांग शास्त्राने देशातील चार महिन्यांच्या पावसाळ्याची एकूण बारा नक्षत्रांमध्ये विभागणी केली आहे. त्याप्रमाणे नक्षत्रनिहाय ग्रह-ताऱ्यांवर आधारित पावसाचा अंदाज वर्तविण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. त्यानुसार पावसाचे पहिले महानक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय. पावसाच्या या पहिल्या रोहिणी नक्षत्राला आज (मंगळवार)पासून सुरुवात होत आहे.

पावसाळ्यापूर्वीच येणाऱ्या या महानक्षत्राचे वाहन मेंढा असून, मंगळवारी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राला सुरुवात होत आहे. सूर्याच्या नक्षत्र प्रवेशावेळी एकही जलकारक ग्रह जलराशीत नसल्याने या नक्षत्रात कमी पावसाचे योग दर्शवितात. २५ मेला होणारे चंद्रग्रहण महाराष्ट्रात दिसणार नसले, तरी हे चंद्रग्रहण पावसासाठी थोडीफार अनुकुलता दर्शविते. त्यायोगे दि. २६ व २७ मे दरम्यान ढगाळ वातावरण राहणार असून, वारा, वादळासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागेल.

या नक्षत्रात केरळ व राज्यातील समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागात कोकण, मुंबई परिसरात वादळी पावसाची शक्यता संभवते. दि. २ जूननंतर उष्णतामान कमी होऊन थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, नियमित व सार्वत्रिक पाऊस या नक्षत्रात होण्याचे योग दिसत नाहीत. तसेच दर्शविण्यात आलेला हा पावसाचा अंदाज पंचांग शास्त्रानुसार, ग्रह व नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित आहे. तरीही शेतकरीवर्गाने हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजावर आधारित आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे.

या रोहिणी नक्षत्रासोबतच आजपासून नवतपाला सुरुवात होत आहे. त्यामुळे हे नऊ दिवस सर्वाधिक तापमानाचे राहण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यात तापमानामध्ये सतत बदल होत राहिला. कधी अवकाळी वादळी पाऊस तर कधी ढगाळ वातावरणामुळे उन्हाळा फारसा जाणवला नाही. परंतु, घाम फोडणाऱ्या ‘नवतपाला’ मंगळवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे पुढील नऊ दिवस चांगलेच ‘ताप’दायक असणार, हे नक्की. कारण उन्हाळ्यात सर्वात जास्त तापमान असणारे दिवस, असा नवतपाचा लौकिक आहे. या दिवसांत हवा व जमिनीचे उष्ण तापमान सर्वात जास्त असते.

नवतपाच्या या नऊ दिवसांचा संबंध पुढे येणाऱ्या पावसाच्या नऊ नक्षत्रांसोबत जोडलेला आहे. जर नवतपा कालावधी ठरल्या अर्थाने उष्ण आणि शुष्क राहिला, तर त्यावर्षी पाऊस उत्तम बरसतो. याउलट नवतपातील नऊ दिवसांत ज्यादिवशी तापमान कमी असेल तसेच गारवा किंवा पाऊस पडल्यास, त्या दिवसाच्या संबंधित पावसाचे नक्षत्र कोरडे जाते किंवा त्या नक्षत्रात पाऊस कमी पडतो, असा जाणकार शेतकऱ्यांचा अंदाज आहे. नवतपाच्या दिवसनिहाय येणारी पावसाची नऊ नक्षत्रे पुढीलप्रमाणे आहेत. मृग, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही ती नऊ नक्षत्रे आहेत.

नवतपा म्हणजे काय?

चंद्राला केंद्रस्थानी ठेवून वर्षभर सूर्याचे भ्रमण, एकूण सत्तावीस नक्षत्रांमधून होत असते, असे पंचांग शास्त्र सांगते. त्यानुसार वर्षाचे ३६५ दिवस २७ नक्षत्रांमध्ये विभागले आहेत. ते विविध १२ राशींच्या अंतर्गत येतात. सरासरी एका नक्षत्राचा कालावधी हा १३ दिवसांपेक्षा थोडा अधिक असतो. सूर्याचा ‘रोहिणी नक्षत्रा’मध्ये होणारा प्रवेश आणि या कालावधीतील प्रथम नऊ दिवस म्हणजे ‘नवतपा’ होय. या नवतपाच्या काळात सूर्य कर्कवृत्ताच्या अगदी जवळ पोहोचलेला असतो. त्यामुळे भारतात तापमान वाढ आणि उन्हाळा हा ऋतू उच्चतम स्थितीमध्ये असतो. नवतपामधील वातावरण तसेच पाऊस घेऊन येणारे नक्षत्र यांचा स्थानिक परिणाम प्रत्येक गाव/ स्थान/ ठिकाण यांच्या केंद्रापासून ५० किलोमीटरच्या परिघात अनुभवता येतो, असे स्थानिक हवामान सांगणाऱ्या जाणकारांचे मत आहे.