शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

साहिर आधी कोरोनात, आता युद्धामुळे परतला घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 5:00 AM

चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : युद्धजन्य स्थितीतून बाहेर कधी पडणार, हा एकमेव विचार युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सतावत आहे. रशियाच्या फायटर विमानांमधून सातत्याने बॉम्बवर्षाव होत आहे. त्यामुळे जिवाची भीती आणि कुटुंबाला पारखे झालेल्या या विद्यार्थ्यांची  पहिली तुकडी शनिवारी रात्री विमानाने भारतात पोहोचली आणि सर्वांना रडूच कोसळले. यावेळी सुटकेचा नि:श्वास चांदूर रेल्वे येथील सारंग तेलंगनेही सोडला. तो या विमानाने भारतात परतणारा पहिला अमरावतीकर ठरला. चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक प्रसन्नजित तेलंग यांचा मुलगा साहिर हा युक्रेनचे प्रशासकीय केंद्र असलेल्या चेरनिव्त्सी शहरातील महाविद्यलयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला आहे. दोन महिन्यात नॅशनल  एक्झाम देऊन त्या पदवी मिळणार होती. युद्धामुळे सुरळीत सुरू असलेला शैक्षणिक प्रवास थांबला आहे. कोरोनामुळे आधी त्यात खंड पडला होता. आता युद्धानंतर परिस्थिती किती दिवसांनी सावरते, याच्या प्रतीक्षेशिवाय गत्यंतर नाही, असे तो म्हणाला. त्याचे मन अजूनही कॉलेज कॅम्पसमध्येच गुंतल्याचे चेहऱ्यावर झळकत होते. 

मुलापुढे सर्व गौण युद्धग्रस्त स्थितीतून मुलगा पहिल्याच फ्लाईटने घरी सुखरूप पोहोचल्याचा आनंद प्रसन्नजित तेलंग यांच्या चेहऱ्यावर होता. इतर पालकांनाही त्यांची मुले सुखरूप मिळोत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

बसने नेले रोमानियाला चेरनिव्त्सी हे मोठे शहर आहे. येथे हजारो विद्यार्थी, त्यात भारतीय प्रवेशित आहेत. बंकरमध्ये शरण घेतलेल्या या युवकांना बसने रोमानियाच्या सीमेवर व तेथून चेक इन करून राजधानी बुखारेस्ट येथील विमानतळावर नेण्यात आले. तेथे एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी रात्री मुंबईत आणण्यात आले. तेथून घरी आल्याचे साहिरने सांगितले. 

दररोज बॉम्बिंगयुक्रेनची राजधानी किव्हवर दररोज बॉम्बिंग केले जात आहे. त्यामुळे या देशात शिकण्यासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासमवेत त्यांचे पालकदेखील चिंताग्रस्त आहेत. एकमेकांशी परिचय, संपर्क असलेल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांचे पालक विचारपूस करतात. 

अमरावतीच्या विद्यार्थ्यांशी पालकमंत्र्यांचा संवादरशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर हजारो भारतीयांसोबतच तिथे अडकलेल्या  साहिरसह जिल्ह्यातील अभिषेक बारबडे, प्रणव फुसे, तुषार गंधे, तनिष्क सावंत, वृषभ  गजभिये, स्वराज पौंड आणि प्रणव भारसाकळे या आठ विद्यार्थ्यांचा संपर्क क्रमांक मिळताच महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने त्यांच्याशी संवाद साधला व दिलासा दिला. तिवसा तालुक्यातील तुषारसह सर्वांना धीर देत केंद्राच्यावतीने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे, असे पालकमंत्री म्हणाल्या.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीwarयुद्ध