शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलिस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:10 AM

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण? अमरावती : ...

प्राण वाचविले, नंतर काठी उगारून काढले ठाण्याबाहेर शहर कोतवाली पोलीस ठाण्यातील घटना, वंचितांचे ऐकणार तरी कोण?

अमरावती : राजकमल चौकाच्या रेल्वे पुलावरून ताब्यात घेतलेल्या महिलेला पोलीस ठाण्यात आणून रात्री आठच्या सुमारास हाकलून देण्यात आले. तिने काही सांगण्यापूर्वी काठी उगारून तिला पिटाळून लावण्यात आले. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत असल्याची कल्पना आल्याने काठी शांत झाली. मात्र, तिला दैव नेईल तिकडे जाण्यास बाध्य करण्यात आले.

अमरावती मुंबई अंबा एक्स्प्रेस निघण्याच्या मुहूर्तावर पुलावरून उडी घेऊन जीव देण्याचा प्रयत्न भटक्या समाजातील एका महिलेने गुरुवारी रात्री सातच्या सुमारास केला होता. अवघ्या पाच वर्षांच्या तिच्या मुलाने हालचाली ओळखून गलका केला. त्यामुळे नागरिक व पोलिसांच्या सीआर व्हेन यांनी तिचा हा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर तिला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राजकमल वा अन्य महत्त्वाच्या चौकात भीक मागून वास्तव्य करणाऱ्या समाजातील या महिलेकडे यामुळेच पोलिसांनी नेहमीच्या सवयीनुसार दुर्लक्ष केले. अगदी जुजबी चौकशीदेखील तीच्या कडून करण्यात आली नाही रात्री आठच्या सुमारास तिला येथून बाहेर काढण्यात त्यांनी धन्यता मानली. ती काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, तिला बाहेर काढण्यात आले आणि पोलीस ठाण्याबाहेर जाण्याचे दरडावून सांगत एका कर्मचाऱ्याने काठी उगारली. तिच्यासोबत चिमुकला होताच. आईला मारहाण होणार, याची कल्पना आलेल्या त्या मुलाने रडणे सुरु केले. यादरम्यान हा प्रसंग चित्रित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे काठी उगारलेल्या कर्मचाऱ्याला थांबवून आणि महिलेला काहीबाही समजावून अन्य कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याबाहेर काढले.

बॉक्स

वंचितांचे ऐकणार कोण?

स्वच्छ अमरावती सुंदर अमरावतीचे ब्रीद मिरवणाऱ्या महापालिकेच्या पुढ्यात सर्वांकडून उपेक्षित अशी कुटुंबे राहतात. जगण्याचे भान नसलेल्या या कुटुंबांमध्ये पुरुष -महिलांना विविध व्यसनाधीनता जडली आहे. त्यांचे योग्य प्रबोधन व पुनर्वसन झाल्यास आणि मुलांना शिक्षणाची संधी मिळाल्यास अशी मानहानी त्यांच्या वाटेला येणार नाही. याकरिता जबाबदारीचे भान ठेवून सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.