शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
3
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
4
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
5
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
6
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
7
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
8
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
9
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
10
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
11
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
12
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
13
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
14
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
15
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
16
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
17
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
18
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
19
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा दररोज नावेतून जीवघेणा प्रवास; पुलाच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2022 2:56 PM

महिनाभरापासून तुटला शाळेशी संपर्क

संदीप राऊत

तिवसा (अमरावती) : अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर तिवसा तालुक्यातील ३५० लोकसंख्या वस्तीचे नमस्कारी गाव. दळणवळणाच्या सोयींचा अभाव, जेमतेम माध्यमिक शिक्षणाची सोय. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना सर्वस्वी वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते. मात्र, दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या वर्धा नदीला पूर आला की, विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन नावेतून शैक्षणिक प्रवास करावा लागतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आजतागायत या नदीवरील पुलाची मागणी पूर्ण न होणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे वास्तव अधोरेखित करणारे आहे.

दुथडी भरून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र नावेतून ओलांडणे म्हणजे प्राणाची बाजी लावणे होय. अशा जोखमेतून नमस्कारी येथील २५ शालेय विद्यार्थ्यांचा खडतर शैक्षणिक प्रवास नावाड्याच्या नौकेवर झुलताना दिसतो आहे. तिवसा तालुक्यातील फत्तेपूर, इसापूर, काटपूर व नमस्कारी अशी चार गावांची सात सदस्यीय गटग्रामपंचायत. माध्यमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा या गावावर अवलंबून राहावे लागते.

विद्यार्थी अशाही परिस्थितीत नावेत बसून शाळेची वाट धरतात; परंतु लहानशा नावेतून नदी ओलांडताना विद्यार्थ्यांना खूप जोखीम पत्करावी लागते. नदीतील पाण्याचा अंदाज घेऊनच नावाडी नदीत नौका टाकतो. नागरिकांनासुद्धा दळणवळणासाठी या एकमेव नावेचा आधार आहे. शासनाने नदीवर पूल उभारावा, एवढीच मागणी गेल्या कित्येक दशकांपासून नागरिक करीत आहेत.

महिनाभरापासून अप्पर वर्धा धरणाचा विसर्ग वर्धा नदीत करण्यात येत आहे. पाणीपातळीत वाढ असल्यास विद्यार्थ्यांची नावच पुढे सरकत नाही. यामुळे शाळेशी संपर्क तुटला आहे. सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य दिलीप काळबांडे यांनी तत्कालीन सीईओ मुथ्युकृष्णन शंकरनारायणन व तत्कालीन अतिरिक्त सीईओ के. एम. अहमद यांच्यामार्फत शासनाकडून नाव उपलब्ध झाली होती. कालांतराने ती नाव वापरण्यायोग्य राहिली नाही.

हा विषय जलसंपदा व अप्पर वर्धा विभागाच्या अखत्यारीत येतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासोबतच तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. पुराच्या पाण्याने विहिरीवरून पाणी वाहून जाते. याबाबत आपण संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करणार आहोत.

- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीSchoolशाळाAmravatiअमरावतीriverनदी