शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दुष्काळावर शिक्कामोर्तब

By admin | Published: March 26, 2016 11:59 PM

खरीप २०१५ या हंगामात जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या १,९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली आहे.

सवलतींचा मार्ग सुकर : जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांना मिळणार लाभअमरावती : खरीप २०१५ या हंगामात जिल्ह्यातील ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या १,९६७ गावांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली आहे. अन्य दुष्काळी गावांप्रमाणेच या दुष्काळी गावांना देखील सर्व सवलती मिळणार आहे. जिल्ह्यात २०१५-१६ या वर्षाकरिता खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४३ पैसे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली होती. शासनाने नोव्हेंबर २०१५ मध्ये राज्यातील १५ हजार ७४७ गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केली. मात्र यामध्ये अमरावती जिल्ह्यास वगळण्यात आले होते. जिल्ह्यात पैसेवारी ५० पैशाच्या आत असली तरी पर्जन्यमान ८० टक्क्यांवर असल्याने दुष्काळस्थिती नसल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दरम्यान राज्यात दुष्काळस्थिती जाहीर करण्याबाबत शासनाने दुजाभाव केला आहे. शासन निकष पैसेवारीचा असताना व ५० पैशांच्या आत पैसेवारी असतानाही अमरावती विभागातील गावांत दुष्काळस्थिती जाहीर करण्यात आलेली नाही. या आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. यावर उच्च न्यायालयाने शासनाला फटकारले तसेच राज्य विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. अमरसिंह पंडित व सुनील तटकरे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या चर्चा दरम्यान ना. एकनाथ खडसे यांनी अमरावती, यवतमाळ, वाशीम व अकोला जिल्ह्यातील ५ हजार ८१० गावांमध्ये दुष्काळस्थिती जाहीर केल्याने जिल्ह्यातील १ हजार ९६७ गावांना दुष्काळाच्या सोई-सवलती मिळणार आहेत. जिल्ह्यात दुष्काळस्थिती घोषित केल्याबाबत जिल्हा प्रशासनाने पुष्टी केली. याविषयी शासन आदेश अद्याप प्राप्त नसल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)या गावांना मिळणार सवलतीजिल्ह्यात अमरावती तालुक्यातील १४३, भातकुली १३७, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूररेल्वे ९०, धामणगाव ११२, तिवसा ९५, मोर्शी १५६, वरुड १४०, अचलपूर १८४, चांदूरबाजार १७०, दर्यापूर १५०, अंजनगाव १२७, धारणी १५२, चिखलदरा तालुक्यातील १५० गावांना दुष्काळाच्या सवलतींचा लाभ मिळणार आहे. शुध्दीपत्रक काढण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर केलेला असताना, अमरावती विभागातील ५० पैशांच्या आत पैसेवारी असलेले जिल्हे दुष्काळी मदतीपासून वंचित ठेवल्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवार १८ मार्च २०१५ रोजी राज्य शासनावर ताशेरे ओढले होते. विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांविषयी शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले होते.