शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

सात लाख हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2017 12:04 AM

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची मदार होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची मदार होती. मात्र या नक्षत्रातील चार दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांसमोर समोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात अद्याप ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये पेरण्या खोळबंल्या आहेत. पाऊसच नसल्याने बियाणे बाजार थंडावला आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मृग नक्षत्रापूर्वी शेतकऱ्यांनी शेतांची खरीपपूर्व मशागत केली. पाऊस येणार या अपेक्षेने किमान ४० हजार हेक्टरमध्ये पेरणी केली. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बिजांकुरण झालेच नाही. त्यामुळे बियाणे कुजायला लागले. ज्या ठिकाणी बिजांकुरण झाले, त्या ठिकाणी इवलीशी रोपे करपायला लागली.त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी धारणी तालुक्यात ४६ हजार ६४२ हेक्टर,चिखलदरा २५ हजार २५४ हेक्टर, अमरावती ५७ हजार ७९१ हेक्टर, भातकूली ५० हजार ३५५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६७ हजार ७७३, चांदूर रेल्वे ४२ हजार ६५१ हेक्टर, तिवसा ४५ हजार ४४४ हेक्टर, मोर्शी ६२ हजार ८४१ हेक्टर,वरूड ४८ हजार ६४६ हेक्टर, दर्यापूर ७० हजार ६६४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४५ हजार ५०३ हेक्टर,अचलपूर ४७ हजार ९८३ हेक्टर, चांदुर बाजार ६० हजार ९९७ हेक्टर, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५५ हजार ४३८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे.असे आहे तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र४जल्ह्यात सद्यस्थितीत ३८,७४४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४१ टक्के म्हणजेच १८,९२९ हेक्टरवर धारणी तालुक्यात पेरणी झाली आहे. अमरावती ४१४ हेक्टर, भातकुली २४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३०८ हेक्टर, चांदूर रेल्वे १३० हेक्टर, तिवसा २८४ हेक्टर, मोर्शी २,९२९ हेक्टर, वरूड ३,०९३ हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४९० हेक्टर, अचलपूर ७७६ हेक्टर, चांदूरबाजार १,१३१ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १० हजार तीन हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामधील किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.२४ दिवसांत केवळ ७३ मि.मी. पाऊसजिल्ह्यात १ ते २४ जूनदरम्यान ११६.९ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्ष ७३.२ मि.मी. पाऊस पडला आहे. ही ६२.६ टक्केवारी आहे. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ८७, भातकुली ५१.३, नांदगाव ८६.८,चांदूररेल्वे ८४.१, धामणगाव रेल्वे ८८.१, तिवसा ७२, मोर्शी ७३.६, वरूड ५५.५, अचलपूर ५९.७, चांदूरबाजार ५४.९,दर्यापूर ७६.६, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७१.२ व चिखलदरा तालुक्यात १०३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनची स्थिती वायव्य राजस्थान ते वायव्य बंगालचा उपसागरदरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात तीन किमीवर चक्राकार वारे व उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.