शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
3
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
4
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
6
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
7
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
8
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
9
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
10
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
11
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
12
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
14
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
15
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
17
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
18
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
19
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
20
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला

ज्येष्ठांनी लसीकरण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:24 AM

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी लसीकरण सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन ...

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी समाजात सामूहिक प्रतिकारशक्ती विकसित होण्यासाठी लसीकरण सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी केले.

गत वर्षांपासून कोविड-१९च्या महामारीसोबत दोन हात करीत आहोत. सुरुवातीच्या काळात त्रिसूत्रीचे महत्त्व सांगण्यात आले. पण, त्याचे पालन बहुतेकांकडून व्हायला बराच काळ जावा लागला. मधल्या काळात काहीशी बेफिकिरीही आली. विषाणू कुठलाही भेदभाव करत नाही. कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. आजपर्यंतच्या सर्व महामारी या तीन ते चार वर्षे चालल्या, असे इतिहास सांगतो. पूर्वी वैद्यकशास्त्र प्रगत नव्हते. त्यामुळे विषाणूचा नैसर्गिक ऱ्हास व सुरक्षित अंतर याच दोन गोष्टी साथ आटोक्यात आणण्यासाठी उपलब्ध होत्या, आता तसे नाही. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आपल्याला या विषाणूबाबत जाणून घेता आले. त्याचाच फायदा आपल्याला ही साथ आटोक्यात आणण्यासाठी होणार आहे, असे निकम यांनी सांगितले.

-------------------

७० टक्के लोकसंख्येत प्रतिकारशक्ती विकसित हवी

नैसर्गिकरीत्याही शक्ती विषाणूचा प्रवेश झाल्यानंतरच विकसित होते. शास्त्रीय मीमांसेनुसार साथ आटोक्यात येण्यासाठी कमीतकमी ७० टक्के लोकसंख्येत सामाजिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली पाहिजे. तसे झाले तर कोरोना संपेल व मानवजात सुरक्षित होईल.

------------

दोन प्रकारे प्रतिकारशक्ती विकसित होते

काही शहरांत झालेल्या सर्वेक्षणानुसार ५० टक्के लोकांमध्ये प्रतिकारशक्ती तयार झाल्याचे दिसून आले आहे. कोणत्याही आजाराची प्रतिकारशक्ती दोन प्रकारे निर्माण होते. एक म्हणजे त्या आजाराचा संसर्ग झाल्याने आणि दुसरे त्या आजाराचे लसीकरण केल्याने होते. आजार होऊ नये म्हणून जी लस दिली जाते, ती खरेतर ज्या विषाणूने आजार होतो त्याचाच घटक किंवा मृत विषाणू किंवा निष्क्रिय विषाणू मनुष्याच्या शरीरात टाकला जातो. शरीर त्याला शत्रू मानून त्याच्याविरोधात प्रतिकारशक्ती तयार करते.

-------------------

शंकाकुशंका निरर्थकच

जेवढ्या लवकर आपण जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करू, त्या सर्वांमध्ये एकदम प्रतिकारशक्ती निर्माण होणार आहे. एकदा प्रतिकारशक्ती निर्माण झाली की, हा विषाणू आपले नुकसान करू शकणार नाही. त्यामुळे लसीविषयी कोणतीही शंका मनात न ठेवता ज्या गटासाठीही लस सध्या उपलब्ध केली आहे, त्यांनी हिरीरीने लसीकरण करून घ्यावे व एक राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक निकम यांनी केले आहे.