शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

संत्राउत्पादक शेतकऱ्यांपुढे संकटांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 5:00 AM

संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देगारपिटीने हवालदिल : कापूसही घरातच पडून

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : लगतच्या वरूडसह मोर्शी तालुका विक्रमी संत्राउत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. मात्र, अलीकडे तालुक्यातील संत्राउत्पादक शेतकरी विविध संकटांचा सामना करत आहे. रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे त्या मालिकेत आणखी भर पडली.संत्री काढणीला आला असताना, कोरोना विषाणूमुळे निर्यातबंदी लादण्यात आली आहे. त्यापूर्वी भीषण दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांनी केला. यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा पडून होता. परिणामी तो कवडीमोल भावात गेला. अशातच अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे आंबिया बहराची संत्री व संत्राबागांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या पावसात दापोरी, डोंगरयावली, घोडदेव, पाळा, सलबर्डी यासह परिसरात अवकाळी पावसासह हलकी गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्याचा तडाखा संत्राउत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी