शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2016 12:46 AM

२० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

ग्रा.पं.चे सहकार्य : गावकऱ्यांची होणार सोयवनोजा बाग : २० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे. या गावतलावमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे होणार असून जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. परिसरातील शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीसुद्धा वाढविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सातेगावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या तलावासाठी युवा समाजसेवक महेश खारोडे यांनी सतत २० वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.या जमिनीवर अतिक्रमण केले होते. परंतु अतिक्रमणधारकांनीसुद्धा समजूत काढूून फार मोठा अडथळा दूर करून अधिकारी-शासन, असा कागदपत्रांचा प्रवास सातत्याने करून तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्य क्षितिज अभ्यंकर, मातकर, ईश्वरकर, बाबरेकर यांचे विशेष सहकार्य घेऊन गावतलाव निर्माण करण्याचे ध्येय पूर्णत्वास आले. भविष्यात गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर रुप धारण करू शकतो, हेच ध्येय समोर ठेवून सातेगाव येथे २० वर्षांच्या तलावाच्या निर्मितीचा सुखकर प्रवास यशस्वी झाला आहे. तलावाच्या संरक्षण सर्वे करताना गावातील राजकीय विरोधी मंडळींनी अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही संरक्षणातच तलावाचा सर्वे आराखडा करताना अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु गावकऱ्यांच्या व अतिक्रमणधारकांच्या सहकार्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यासाठी महेश खारोडे यांनी पाणी प्रश्नावर गावात जास्तीत जास्त पाणवठ्याची जलशिवाराची कामे आपल्या भागात कशी जास्त केली जातील, यासाठी अण्णा हजारे, पोपटराव पवार नाम फाऊंडेशन यांच्यासोबतसुद्धा पाण्यावर जास्तीत जास्त काम कसे करता येतील, नदी-नाल्यावर बंधारे, शेततळे, पाणी पश्नावर चर्चा लेख लिहून पाण्यासाठी जास्तीत जास्त काम करत असतात. या कामातूनच आपल्या गावात त्यांनी मोठा गावतलाव निर्मितीचा उद्देश साध्य केला आहे. या तलावाच्या कामामुळे सर्व गावकरी, शेतकरी समोरील पाण्याचा संकटापासून भयमुक्त होऊन आनंदी झाले.(वार्ताहर)