शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

'सावली'साठी त्या वृद्धाची पायपीट !

By admin | Published: March 07, 2016 12:04 AM

पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो.

परिचर्या वसतिगृहासमोरील प्रकार : कुटुंबाने नाकारले, समाजाने झिडकारले, मग जायचे कुठे ?अमरावती : पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो. सायंकाळी उतरते ऊन्ह अंगावर पडताच पुन्हा रस्ता ओलाडून फुटपाथवर जातो, अशी ही त्या वृद्धाची पायपीट दररोजच सुरू असते. इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोर हा प्रकार ये-जा करणाऱ्यांना पहायला मिळत आहे. मात्र, आजपर्यंत त्या वृध्दाला आधार देण्याकरिता प्रशासन किंवा सामाजिक संघटना सरसावल्या नाहीत, ही शोकांतिका अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपासून इर्विन चौकातच भीक मागणारे राजाराम वसंत बोपशेट्टी (६०) हे बुधवारा परिसरात राहत होते. आई-वडिलांच्या छत्रछायेत जगत असताना राजाराम हे घराच्या आवारात पाय घसरून पडले. त्यांच्या कंबरेचे हाड मोडले, तेव्हापासून त्यांच्या जीवन संकटमय झाले. कंबरेचा हाड मोडले होते. मात्र, परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी इर्विनमध्ये उपचार सुरू केले. मात्र, कंबरेच्या दुखण्यातून त्यांना अखेर कायमचे अपंगत्व आले. त्यातच आई-वडील वारल्यानंतर दु:खांचे दिवस सुरू झाले. तुटक्या घरात राहणार तरी किती दिवस, असा विचार करून राजाराम यांनी पाच वर्षांपूर्वी भीक मागणे सुरू केले. त्यासाठी इर्विन चौक हा वर्दळीचे ठिकाण त्यांनी निवडले. इर्विन चौकातील अन्नकुटावर जीवनाचा प्रवास सुरू केला. जेवण मिळाले मात्र, छत नाही, छत नाही तर सावली कशी मिळणार, अशी स्थिती राजाराम यांच्यासमोर निर्माण झाली. मात्र, त्याचाही जालीम उपाय त्यांनी शोधला. सकाळी ऊन्ह पडल्यावर दुभाजकावरील वृक्षांची सावली रस्त्यावर पडते. त्यामुळे राजाराम हे पाय घासत हाताच्या साह्याने रस्ता ओलांडून दुभाजकाजवळ जातात, तेथील वृक्षांच्या सावलीत बसतात किंवा कधीकाळी झोपतातदेखील. मात्र, सायंकाळी मावळत्या सूर्याची किरणे अंगावर पडताच पुन्हा रस्ता पाय घासत हाताच्या बळावर पुन्हा रस्ता ओलांडून परिचर्या वसतिगृहासमोरील फुटपाथवर येतात. दरम्यान, त्यांचे जेवण आणून देण्यासाठी एक महिला वृध्द भिकारीसुध्दा सोबतीला असते. ती वृध्दा जालना येथील असल्याचे सांगत असून ती आपले नाव मीरा महाजन सांगते. राजाराम व मीरा हे दोघेही संगतीने जेवणसुध्दा करतात. (प्रतिनिधी) या निराधार वृद्धांची जबाबदारी कुणाची ?अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना निराधारांना आधार देणार कोणी नाही. प्रशासन विकास कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, त्यातच सामाजिक दायित्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्था विविध उपक्रमांद्वारे निराधारांचे पुनर्वसनसुध्दा करतात. मात्र, शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार वृध्दाकडे कोणी का लक्ष पुरवित नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.