शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठा समाज.. वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचा संताप

By गणेश वासनिक | Published: September 26, 2022 5:13 PM

तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले आक्रमक

अमरावती : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्याच्या ‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. असा सणसणीत टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती येथे पत्रपरिषदेतून भाजपला लगावला.

नाना पटोले गत दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली. राज्यातील ‘ईडी’ सरकार हे दिल्लीच्या ईशाऱ्यावर चालत आहे. मोदी-शहांच्या आदेशानुसार मंत्रिमंडळाचे वाटप झाले. म्हणूनच एका मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपविले, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे गुजरात दौऱ्यावर गेल्याबाबत नाना पटोले यांनीआता राज्य सरकारला प्रत्येक गोष्ट गुजरातलाच विचारून करावी लागेल. त्यामुळेच महाराष्ट्रातून दीड लाख लोकांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प मोदी-शहा यांना सहजतेने पळवून नेता आला, असे ते म्हणाले. 

राज्य सरकारने तानाजी सावंत प्रकरणी माफी मागावी, अन्यथा हा मुद्दा आगामी विधानसभेत उपस्थित करून सरकार बरखास्त करण्याची मागणी करू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार शेतकरी, बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, समस्यांबाबत बोलत नाही, अशी टीका केली. 

यावेळी माजी मंत्री ॲड. यशेामती ठाकूर, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार बळवंत वानखडे, वजाहत मिर्झा,डॉ. सुनील देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास ईंगोले, डॉ.अंजली ठाकरे आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेTanaji Sawantतानाजी सावंतcongressकाँग्रेस