शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

धक्कादायक! पाणी पिल्याने शेकडो कामगारांना विषबाधा

By उज्वल भालेकर | Updated: January 12, 2025 21:18 IST

नांदगाव पेठ एमआयडीसीतील घटना, इर्विनमध्ये ४१ रुग्ण दाखल

उज्वल भालेकर / अमरावती : शहरातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये कार्यरत कामगारांनी पाणी पिल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कामगारांना अचानक संडास, उलट्या सुरु झाल्याने हा प्रकार उघड झाला. शंभरच्या जवळपास कामगारांना विषबाधा झाल्याचे कामगारांचे म्हणणे असून यातील ४१ रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तर काही खासगी रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने रुग्णालय गाठून संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

शहरातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात गोल्डन फायबर नावाची कंपनी असून येथे १८० च्या जवळपास कामगार कार्यरत आहे. या कंपनीमध्ये धागा तयार केला जातो. सकाळच्या ८ वाजताच्या शिफ्टमध्ये येथे कामगार कामावर आले. यावेळी त्यांनी येथील पाणी पिल्यानंतर काही वेळाने त्यांना उलटी, संडास सुरु झाली. हा प्रकार लक्षात येताच सुरुवातीला कंपनीने खासगी डॉक्टरांना बोलवून उपचार सुरु केले होते. परंतु याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने कंपनी गाठली.

यानंतर विषबाधा झालेल्या कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास ४१ कामगार हे इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये ३६ महिला तर ५ पुरुष कामागरांचा समावेश आहे. यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून विषबाधा झालेल्या महिलांकडून संबधित प्रकार जाणून घेतला. यावेळी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कंपनीच्या एचआर प्रमुखाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती