शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

एसटीच्या ताफ्यात दीडशे बसचा तुटवडा; अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:34 IST

तीन वर्षांत घटली बसची संख्या : विभागाचा ४६५ बसचा भार, ३२६ गाड्यांवरच मदार

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : एकीकडे एसटीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रिक गाड्या दाखल होत आहेत; पण सर्वसामान्य प्रवाशांची निकड लक्षात घेता सन २०१९ मध्ये ४६५ बसगाड्या होत्या. त्या तुलनेत अमरावती विभागाला १४५ गाड्यांची कमतरता असल्याने एसटी प्रशासनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, दुसरीकडे कमी एसटी बसमुळे मात्र प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

अमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाचे अमरावती, बडनेरा, परतवाडा, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड आणि चांदूर रेल्वे, असे आठ एसटी आगार आहेत. या आगारांमध्ये सन २०१९ मध्ये ४६५ एसटी बसगाड्या होत्या. एप्रिल २०२३ मध्ये बसची संख्या ३६५ वर आली. यामधील तब्बल १०० गाड्यांचे आयुर्मान संपल्याने टप्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात आले. आल्यात. अशातच एप्रिल २०२४ मध्ये या एसटी बसची संख्या ३२६ वर आली आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत एसटी महामंडळाच्या ३२६ बस गाड्यांपैकी ४५ गाड्यांचे आयुर्मान संपल्याने टप्प्याटप्प्याने स्क्रैप करण्यात येणार आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी अमरावती विभागात एसटीच्या ताफ्यात सुमारे ४६५ एसटी बस होत्या. ती संख्या मार्च महिन्यापर्यंत तरी यापैकी २८१ वर येणार आहे. अशातच मागील काही दिवसांपासून बसमध्ये बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. 

शासनाने एसटी बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास यासह अन्य अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविल्या जात आहेत. परिणामी, एसटी बसकडे प्रवाशांचा ओढाही वाढला आहे. विशेष म्हणजे, एसटी बसचा तुटवडा असल्याने पैसे देऊन रस्त्यावर ताटकळण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. एसटी गाड्यांची तोकडी संख्या हे महत्त्वाचे कारण आहे. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशातच अमरावती विभागाला नव्या गाड्या कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. 

गाड्या बिघाडीचे प्रमाण वाढले एसटी बसमध्ये इंजीन बिघाड, इलेक्ट्रिकल नादुरुस्त, ट्रान्समिशन फेल, एक्सेल तुटणे, सस्पेन्शन आदी समस्या उद्भवत आहेत. याशिवाय खराब रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे गाड्यांना नियोजित वेळेत पोहोचता येत नाही. खड्ड्यांमुळे एसटी बसेसमध्ये बिघाडाचे प्रमाणही वाढले आहे.

"महामंडळाकडून तिकिटात सवलत असल्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांची एसटी बसेसना गर्दी होते. महिलांसोबत लहान मुलेदेखील एसटीतून प्रवास करतात. एसटी बसेसची संख्या कमी असल्याने दाटीवाटीने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना प्रवास करावा लागत आहे. गाड्यांची संख्या वाढली नसल्याने प्रवाशांना गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून नव्या बसेस अमरावती विभागाला त्वरित उपलब्ध द्याव्यात आहे." - गौरव भिसे, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Amravatiअमरावती