शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

साहेब, आमच्या जिवाचे काहीच मोल नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 4:22 PM

Amravati : तहसील कार्यालयात नागरिकांना दूषित पाणी, स्वच्छतेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील सर्वांत महत्त्वाचे असलेल्या कार्यालयात शासकीय दाखले, मालमत्तेची खरेदी-विक्री, शालेय दाखले, शेतशिवाराच्या भानगडी अशा एक ना अनेक कामकाजासाठी शेकडो नागरिक तहसील कार्यालयात येरझारा घालतात. परंतु, येथे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येथील वॉटर कूलरमधून जंतुजन्य पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

या जंतुसंसर्गित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याची तहसील प्रशासनाला पुसटशीही कल्पना नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाची ही अनभिज्ञता सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शासकीय कामकाजानिमित्त येणाऱ्या गोरगरीब आबालवृद्धांना पिण्यासाठी येथे वॉटर कूलर लावण्यात आले आहे. परंतु, ज्या टाकीतून वॉटर कूलरला पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, त्या पाण्याच्या टाक्या झाकणविरहित असून, त्यामध्ये तुडुंब जलचर वनस्पती तथा जीवजंतू साचले आहे. तहसील कार्यालय नवीन वास्तूत स्थलांतरित झाले तेव्हापासून त्या टाक्यांची साफसफाई करण्यात आली नसून, याबाबत तहसील प्रशासनाने कधी गांभीर्यच दाखविले नाही. त्यामुळे आरोग्याची समस्या उद्भऊ शकते.

स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था तहसील कार्यालयात असलेल्या स्वच्छतागृहांपैकी अर्धेअधिक कुलूपबंद आहेत, तर वापरातील स्वच्छतागृहांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्याची दुर्गंधी तहसील कार्यालयाच्या आवारात पसरते.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना मात्र वॉटर कॅनविशेष म्हणजे, येथे कार्यरत अधिकारी, कर्मचारी कधीच वॉटर कूलरचे पाणी पित नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक दालनात शुद्ध वॉटर कॅनची सोय आहे.

'लोकमत'ने शोधले वास्तवतहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिक पीत असलेले पाणी दूषित व जंतुजन्य असल्याचा संशय येताच लोकमतने पाण्याच्या टाकीची पाहणी केली. तेव्हा शेवाळयुक्त व घाण साचलेल्या पाण्याच्या उघड्या टाक्या निदर्शनास आल्या.

पावसाळ्यात धोकापावसाळ्यात पाण्यात जंतुजन्य संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे स्वच्छ व उकळलेले पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

मेंटेनन्स निधी जातो कुठे?स्थानिक कार्यालयातील नियमित नियोजनासाठी तहसील कार्यालयाला निधी प्राप्त होतो. हा निधी नेमका कुठे खर्च होतो, अशी विचारणा टाक्यांच्या स्थितीवरून केली जात आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणwater shortageपाणीकपातAmravatiअमरावती