शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

एसएमएस कंपनीचे दूषित पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:09 AM

फोटो पी १७ नांदगाव पेठ नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये ...

फोटो पी १७ नांदगाव पेठ

नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये शिरले आहे. यामुळे नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रवाहाने हे दूषित पाणी वाहत आता बोर नदी प्रकल्पात जात असून, भविष्यात परिसरातील शेती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

नजीकच्या आस्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या कालव्यात या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्याचे थर साचलेले आहे. हे पाणी पावसाच्या प्रवाहाने जलस्रोतांमध्ये शिरत आहे. शिवाय नदीच्या कालव्यातून हे पाणी नव्याने बनलेल्या बोरनदी प्रकल्पातदेखील शिरत असल्यामुळे आजूबाजूची शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होणार आहे. एसएमएस कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतीत हे केमिकलयुक्त पाणी शिरल्याने येथील संत्रीच्या बागा व शेतातील उत्पादन कायमचे बंद झाले आहे. नुकतेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर बाधित झालेली शेती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. या कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपनीने आजवर कोणतीच दाखल घेतलेली नसून, हे दूषित पाणी बघण्यासाठी नुकतेच ग्रामपंचायत सदस्य बाळू राऊत, छत्रपती पटके, गोलू नागापुरे व मोरेश्वर इंगळे यांनी मोका पाहणी करून कंपनीवर कारवाईची मागणी केली.