शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कुणाला हवे घरकुल, कुणी म्हणतं पाणी द्या; प्रशासकीय यंत्रणेची मेळघाटात वारी

By जितेंद्र दखने | Updated: July 18, 2024 22:46 IST

जिल्हाधिकाऱ्यासह एचओडी पोहोचले आदिवासीच्या दारी

जितेंद्र दखने, अमरावती: कुणाला घरकुल नाही भेटले, तर कुणी म्हणतं पिण्यासाठी पाणी नाही. योजनांचा लाभ भेटत नसल्याची व्यथा मेळघाटातील आदिवासींनी मांडली. या बाबी प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या दारी गुरुवारी पोहोचली. यानिमित्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी स्वत: थेट चिखलदरा व धारणी तालुक्यातील विविध गावात जाऊन प्रत्यक्ष आदिवासी बांधवांनी संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

मेळघाटमध्ये विविध समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर अनेक प्रयत्न केले जातात. तरीही महत्त्वाचे प्रश्न, समस्या, आदिवासी बांधवाच्या अडचणी तसेच राहून जातात. त्यामुळे मेळघाटातील विविध समस्या जाणून घेऊन ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि महत्त्वाच्या समस्या प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि सीईओ संजिता मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवस मेळघाटासाठी हा उपक्रम १८ जुलै रोजी अधिकाऱ्यांची वारी मेळघाटातील जनतेच्या आदी हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी मेळघाटातील विविध गावात पोहोचले. चिखलदरा तालुक्यात कोहाना गावात जिल्हाधिकारी साैरभ कटियार व अधिकाऱ्यांची चमू पोहोचली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त सीईओ संतोष जोशी, डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके, डीएचओ डॉ. सुरेश असोले उपस्थित होते. जिल्हाधिकारी थेट अंगणवाडी केंद्रात पोहोचले अन् तेथील आहाराबाबतची माहिती जाणून घेतली. याशिवाय रेशन दुकान जाऊन धान्य वितरण व्यवस्था चौकशी केली. सोबत ग्रामस्थासोबत संवाद साधून आदिवासी बांधवांच्या समस्या आस्थेने जाणून घेतल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी योग्य कारवाईचे आश्वासन दिल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधान झाले.

टॅग्स :Amravatiअमरावती