शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
2
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
3
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
4
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
5
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
6
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
7
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
8
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
9
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...
10
माघारीसाठी दबाव, पण सदा सरवणकरांचं अखेर ठरलं; मुलाच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
11
एका शेअरवर ९ शेअर्स फ्री देणार 'ही' कंपनी; वर्षभरात दिलाय ४००% चा रिटर्न, शेअर सुस्साट...
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! गॅरी कस्टर्न यांचा राजीनामा; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क
13
Arvind Kejriwal : "भाजपाला मत दिलं तर..."; अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली निवडणुकीबाबत मोठा दावा
14
“उद्धव अन् राज यांनी अजिबात एकत्र येऊ नये”; अमित ठाकरे स्पष्टच बोलले, कारणही सांगितले
15
"प्रसिद्ध अभिनेत्याने मला एकटीला बोलवलं...", ईशा कोप्पिकरला आला होता कास्टिंग काऊचचा अनुभव
16
मविआमधील तिढा सुटेना, शरद पवार यांनी जागावाटपाबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...  
17
Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या आयपीओनं केलं मालामाल, ७०% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी मोठा फायदा
18
मोठी बातमी! जनगणना पुढील वर्षीपासून होण्याची शक्यता; लोकसभा मतदारसंघांवर मोठा परिणाम होणार
19
भारताच्या अरमान भाटीयाने जिंकली इंडिया मास्टर्स पिकलबॉल स्पर्धा; अमेरिकन खेळाडूला हरवलं!
20
"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

सोयाबीन, तुरीच्या दरात वाढ

By admin | Published: April 03, 2016 3:49 AM

खरिपाचा हंगाम संपला, शेतकऱ्यांजवळ माल नाही, अशा स्थितीत सोयाबीन व तुरीच्या दरात किंचीतही वाढ झाली.

व्यापाऱ्यांना फायदा : सोयाबीन ३,९५०, तूर ८,८५० रुपये क्विंटलअमरावती : खरिपाचा हंगाम संपला, शेतकऱ्यांजवळ माल नाही, अशा स्थितीत सोयाबीन व तुरीच्या दरात किंचीतही वाढ झाली. याचा व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे. सद्यस्थितीत सोयाबीन ३९०० ते ३९५० रुपयांवर पोहोचले आहे. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांनी हंगामातच माल विकल्याने काही मोजक्या शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना याचा लाभ होत आहे.यावर्षी खरिपाच्या सर्व पिकांच्या सरासरी उत्पन्नात घट आली आहे. मूग व उडदाचे पीक पावसामुळे उद्ध्वस्त झाले. तीच गत सोयाबीनची झाली. क्विंटलऐवजी किलोची झडती आली. जमिनीत आर्द्रता नसल्याने रोग व शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली. अशा परिस्थितीत तेलबिया, कडधान्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र सुरुवातीला तुरीचे भाव वगळता सोयाबीन व इतर कडधान्याचे भाव कोसळले आहे. सुरुवातीला तुरीला १० ते साडेदहा हजारांपर्यंत भाव मिळाला. नंतर दोनच आठवड्यात हे भाव घसरून ७ ते ८ हजारांवर आले. सद्यस्थितीत बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक कमी झाली आहे. साधारणपणे ४ ते ५ हजार पोत्यांची आवक होत आहे. मागील आठवड्यात ३३०० ते ३५०० पर्यंत सोयाबीनचे भाव होते. त्यामध्ये आता किंचित वाढ झाली आहे. ३९०० ते ३९५० पर्यंत रुपये क्विंटल पर्यंत भाव पोहचले आहे. पुढे आणखी भाव होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)