शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

एसटी धावणार टोलनाक्याविना !

By admin | Published: February 21, 2017 12:13 AM

कुठल्याही महत्त्वाच्या स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार मनात सुरू होतो.

लवकरच ई-टॅग प्रणाली : दर्शनी भागावर असेल विशिष्ट स्टीकर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयोगजितेंद्र दखने अमरावतीकुठल्याही महत्त्वाच्या स्थळी ठराविक वेळेत पोहोचण्यासाठी बसमध्ये बसल्यानंतर किती वेळेत पोहोचणार याचा विचार मनात सुरू होतो. पण टोलनाक्यावर एसटीला ब्रेक लागतो. काही वेळेस १५ ते २० मिनिटे सहज जातात. अन् चिडचिड सुरू होते. याला आता खो बसणार आहे. एसटीच्या नवीन ‘ई-टॅग’ प्रणालीमुळे टोलनाक्यावर कोणत्याही अडथळ्याविना एसटी धावू शकणार आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो गाड्या दररोज रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे एसटीसाठी टोल फ्री करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. याला अद्याप यश आले नसले तरी एसटीला मासिक पास दिली जात होती. यामुळे दररोज पैसे द्यावे लागत नसले तरी वेळ मात्र जातच होता. हाच वेळ वाचविण्यासाठी एसटीने ई-टॅग ही आधुनिक प्रणाली अतित्वात आणली आहे. ई-टॅग प्रणाली राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या बसेससाठी उपलब्ध असणार आहे. यामध्ये एसटीच्या दर्शनी भागातील काचेवर विशिष्ट प्रकारचे स्टिकर चिकटवलेले असेल एसटी राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर गेल्यास आहे त्याच वेगात स्टिकर स्कॅन केले जाईल. त्यानंतर त्याची नोंद तेथील संगणकावर केली जाणार आहे. यासाठी बँकेमध्ये आगारनिहाय खाते उघडलेले असेल. या खात्यामध्ये दरमहिन्याला ठराविक रक्कम भरणा केली जाणार आहे. एसटीचे स्टिकर स्कॅन झाल्यावर गाडीच्या नंबरची नोंद होणार आहे. त्यामुळे त्याच क्षणी बँकेच्या खात्यातून ठरलेली रक्कम कापून घेतली जाणार आहे. याचा संदेश तत्काळ विभाग नियंत्रक, लेखाअधिकारी व आगार व्यवस्थापकांना जाणार आहे. टोलमध्ये दहा टक्के सवलतई-टॅग प्रणाली अतित्वात आल्यानंतर पथकराच्या रकमेत दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून आलेले वाहन तांत्रिक कारणामुळे बंद पडल्यास त्या वाहनांना पर्यायी वाहन देण्याचे अधिकार संबंधित आगार व्यवस्थापकांना दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.राष्ट्रीय महामार्गावर स्वतंत्र लेनराष्ट्रीय महामार्गावर ई-टॅग लावलेल्या स्टिकरच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. त्यामुळे रांगेत वाहने उभी करणे, एखादे छोटे वाहन मध्येच शिरल्यास होणारी वादावादी त्यातून मार्ग काढून टोलनाक्याच्या वसुली केंद्रात पोहोचल्यावर पैसे किंवा पास दाखविणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. मार्गावर धावणाऱ्या वाहनांची नोंदयासाठी एसटी महामंडळ कोणत्या मार्गावर कोणत्या गाड्या धावणार आहेत याचे नियोजन करून ते राष्ट्रीय महामार्ग विभागाला देणार आहेत. आपत्कालीन अडचण आल्यास पर्याय म्हणून अतिरिक्त वाहनांची यादी दिली जाणार आहे. त्यामुळे अडचणी येणार नाहीत.