शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

राज्याच्या नियोजनाअभावी हुकली देशभरातील वाघांची आकडेवारी

By गणेश वासनिक | Published: October 10, 2022 12:00 PM

महाराष्ट्रात पुन्हा होणार व्याघ्र प्रगणना, एनटीसीएचे वनविभागाला निर्देश

अमरावती : व्याघ्र प्रगणनेत महाराष्ट्र वनविभागाने मनमर्जीने काम करून अत्यंत चुकीची आणि त्रुटीयुक्त माहिती सादर केल्यामुळे देशभरातील वाघांचा आकडा नेमका किती, हे समोर येण्यास विलंब होत आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने महाराष्ट्रात नव्याने वाघांची प्रगणना करण्याचे निर्देश दिले. परंतु, ऑक्टोबरमध्ये होणारी प्रगणना पावसामुळे लांबली. राज्यात बिबट्यांची संख्या ४२२६ असल्याच्या आकडेवारीचा यात समावेश आहे.

दर पाच वर्षांनी देशभरात वाघ, बिबट्यांसह इतर वन्यजीवांची प्रगणना केली जाते. त्याअनुषंगाने एनटीसीएने फेब्रुवारी २०२२ मध्ये देशातील सर्वच राज्यांना वन्यजीव प्रगणना करण्याचे निर्देश दिले होते. व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य, प्रादेशिक वनक्षेत्रात ऑनलाइन प्रगणना करण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रगणनेचा डेटा एनटीसीएकडे सादर करण्यात आला. यात एनटीसीएने रॉ मोबाइल, डेक्टॉक्स, बॅकअप डेटा तपासणी केली असता राज्याच्या प्रादेशिक, व्याघ्र प्रकल्पअंतर्गत ६८ वन विभागाने चुकीचा डेटा सादर केल्याची धक्कादायक बाब एनटीसीएच्या लक्षात आली. त्यामुळे एनटीसीएने महाराष्ट्र वनविभागाला पुन्हा व्याघ्र प्रगणना करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याच्या वनविभागाच्या अक्षम्य चुकीमुळे देशपातळीवर वाघांची अचूक आकडेवारी जाहीर करता आली नाही, हे विशेष.

म्हणून प्रगणना पुढे ढकलली

एनटीसीएच्या पत्रानुसार, १० ऑक्टोबरपासून राज्यात व्याघ्र प्रगणना केली जाणार होती. तशी तयारीदेखील करण्यात आली. मात्र, १६ ऑक्टोबरपर्यंत राज्यात वादळ, वारा, पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे तूर्त प्रगणना पुढे ढकलण्याचा निर्णय वनविभागाने घेतला.

राज्यात ४,२२६ वनबीटमध्ये झाली प्रगणना

ऑनलाईन व्याघ्र प्रगणनेसाठी वनरक्षकांना फेब्रुवारी २०२२मध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. देशातील ३५ राज्यांनी प्रगणनेचा अचूक आकडा एनटीसीएला सादर केला. मात्र, राज्यात ४,२२६ वन बीटमध्ये प्रगणना करताना घोळ झाला आहे. यात अलिबाग २२७, गोंदिया २३६, मेळघाट व्याघ्र प्रकल्प २८०, नागपूर २३५, आलापल्ली १५२, गडचिरोली १५० असा वनबीटचा समावेश आहे. त्यामुळे वनरक्षकांना दिलेले ऑनलाईन प्रगणनेचे प्रशिक्षण कुचकामी ठरल्याने आता पुन्हा नव्याने प्रगणना होणार असल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव विभाग पूर्व) बी. एस. हुडा यांनी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी वनाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

अशी चुकली वन्यजिवांची प्रगणना

अशी चुकली वन्यजिवांची प्रगणना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने महाराष्ट्रातील प्रगणनेचा ऑनलाईन डेटा तपासणी केला असता, सहा दिवसांमध्ये वाघ, बिबट, गवा, हरीण, काळवीट व इतर वन्यप्राण्यांच्या चिन्हांची नोंद घेताना तीन दिवसात १५ किमी पायी चालणे अपेक्षित होते. मात्र, अनेक वनरक्षकांनी ते केले नाही. काहींनी वनबीटचा डेटा उपलब्ध केलेला नाही. एवढेच नव्हे तर काही वनकर्मचाऱ्यांनी वाहन वापरले. ट्रान्झीट लाईनवर सकाळी ९ वाजण्यापृूर्वी चालणे अपेक्षित असताना अनेक जणांनी दुपार निवडली. विविध आकाराच्या सॅम्पल प्लॉट पाचपेक्षा कमी ठिकाणची माहिती गोळा करण्यात आली. अशा अनेक त्रुटींवर एनटीसीएने बोट ठेवले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघGovernmentसरकारforest departmentवनविभाग