शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

वन विभागात बदल्यांचे कठोर नियम आरएफओंना लागू, इतर पदांना मुभा

By गणेश वासनिक | Published: October 01, 2022 6:16 PM

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना कठोर नियमावली; सहायक वनसंरक्षक, उपवनसंरक्षकांना बदल्यांमध्ये शिथिलता

अमरावती : राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बदल्यांमध्ये कठोर नियम लावले जात असताना उपवनसंरक्षक, सहाय्यक वनरक्षकांपासून कनिष्ठ वनकर्मचाऱ्यांना शासन निर्णयाला डावलून प्रादेशिकमध्ये पोस्टींग दिल्या जातात. इतरांसाठी मात्र, हा निर्णय लागू होताना दिसून येत नाही. अनेक समस्यांनी आरएफओ हे पद सध्या घेरलेले दिसून येते.

राज्याच्या वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे पद हे सर्वात महत्वाचे असून या पदाभोवती वनविभागाचे विकासचक्र फिरत असते. राज्याच्या वनविभागात सामाजिक वनीकरण विभाग वन्यजीव विभाग, प्रादेशिक विभागामध्ये ९२३ वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, प्रादेशिक वनविभाग वगळता अन्य विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या पदांपेक्षा सुविधांपासून वंचित असल्याने वनविभागात प्रचंड नाराजी दिसून येते.७५ वर्षानंतरही तेवढीचं पदे

राज्याच्या वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद ७५ वर्षांपासून आहे. आरएफओंची तेवढेच पदे कायम आहे. या कालावधीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांची २२ पदे, मुख्य वनसंरक्षकांची ४३ पदे आणि प्रधान मुख्यवन संरक्षकांची ५ पदे वाढली. उपवनसंरक्षकांची ४५ पदे वाढली आहेत. पोलीस निरीक्षक समकक्ष पदाच्या तुलनेत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पदे १० टक्के एवढेच आहेत.साईड पोस्टींग समस्या ग्रस्त

वनविभागात सामाजिक वनीकरण, वन्यजीव, विभागात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पोस्टींग ही अत्यंत दैनावस्था समजली जाते. तालुका स्तरावरील या पदाला साधे कार्यालय नाही. राज्यात सामाजिक वनीकरणात २५० च्या आसपास परिक्षेत्रांना कार्यालय नाही. तालुका सांभाळत असताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या हाताखाली केवळ २ वनकर्मचारी असतात. तुटपुंज्या व्यवस्थेत वनपरिक्षेत्र अधिकारी या ठिकाणी कामे करतात. वेतन वेळेवर मिळत नसल्याचे भीषण वास्तव आहे. शासकीय निवासस्थान सुद्धा बांधून दिल्या जातं नाही.बदल्यांमध्ये भेदभाव का?

वनविभागात इतर सर्वपदांच्या बदल्या झाल्यानंतर अशा पदांवरील वनाधिकारी व कर्मचारी यांना प्रादेशिक ते प्रादेशिक निर्णय डावलुन पोस्टींग मिळते. मात्र, आरएफओंना शासनाचा नियम काटेकोररपणे लावला जातो, सहाय्यक वनसंरक्षक,उपवनसंरक्षक, वनपाल या पदांवरील बदल्या सर्रासपणे प्रादेशिक ते प्रादेशिकमध्ये होतात. हा नियम वरिष्ठ स्तरावर लावल्या जात नाही. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या गेल्या ३ वर्षांपासून विनंतीच्या बदल्या झालेल्या नाही, हा त्यांच्यावरील मोठा अन्याय दिसून येतो.वाहनास इंधन नाही

परिक्षेत्र स्तरावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना संकटकालीन व्यवस्था म्हणून शासकीय वाहन मिळाले आहेत. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ४०० वाहनांना गेल्या वर्षभरापासून इंधनासाठी स्वतंत्र अनुदान मिळालेले नाही. परिणामी अनेक वाहने परिक्षेत्र कार्यालय स्तरावर उभी दिसून येतात.

टॅग्स :forest departmentवनविभागTransferबदलीGovernmentसरकार