शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

युक्रेनच्या युद्धात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 5:00 AM

युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रशिया आणि युक्रेन या देशांत सुरू झालेल्या युद्धामुळे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसला आहे; तर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहे. गुरुवारी हिमवृष्टी आणि उणे १० डिग्री तापमान असतानासुद्धा अमरावतीचा ऋषभ गजभिये याने रोमानियाची सीमा गाठली, तर स्नेहा लांडगे ही दिल्ली येथे पोहोचल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११ पैकी ६ विद्यार्थी भारतात पोहोचले असून, ५ विद्यार्थी प्रवासात आहेत.युक्रेन येथे उच्च शिक्षणासाठी अमरावती जिल्ह्यातील ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी दोन विद्यार्थी घरी परतले असून, चार विद्यार्थी देशात दाखल झाले आहेत. मात्र, रशिया, युक्रेन यांच्यात युद्ध थांबण्याची चिन्हे दिसून येत नाहीत; त्यामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. युद्धाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असलेल्या खारकीव्हमधून ऋषभ गजभिये निघाला आहे. त्याने रोमानियाची सीमा गाठली आहे. गत तीन दिवसांपासून रोमानिया सीमेवर हिमवृष्टी होत असल्याने सीमा पार करताना जीव मुठीत घेऊन भारतीय व रोमानिया दूतावासांत पोहोचावे लागले. एकूणच भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीचे वेध लागले आहेत. गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्वराज गणेश पुंड निवासस्थानी पोहोचला. यावेळी नागरिकांनी त्याचे स्वागत केले.

थंडीचे तीन दिवस जीवन-मरणाचेरोमानिया सीमेवर तीन दिवस हिमवृष्टीमुळे मरणयातना भोगाव्या लागल्या. दूतावासात चांगली वागणूक मिळाली नाही. थंडीमुळे प्रचंड वेदना सहन कराव्या लागत आहेत, अशा संतप्त भावना युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आहेत. सीमा ओलांडताना जीव मुठीत घेऊन वृषभ बाहेर पडला, असे त्याचे वडील वैभव गजभिये यांनी सांगितले. सर्वच विद्यार्थी सुखरूप यावे, अशी मनीषा व्यक्त केली.

युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी ११ विद्यार्थी गेले आहेत. त्यांपैकी आतापर्यंत ६ विद्यार्थी भारतात दाखल झाले आहेत. पाच विद्यार्थी मायदेशी परतण्यासाठी मार्गस्थ आहेत.- आशिष बिजवल, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

ऋषभ याने अतिशय कठीण प्रसंगातून युक्रेनमधून रोमानियाची सीमा ओलांडली आहे. रेल्वे, टॅक्सी यांचा त्याला आधार घ्यावा लागला. अमरावतीत पोहोचण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. गुरुवारी व्हिडिओ कॉलने त्याने संवाद साधला. विशेष विमान उपलब्ध झाल्यानंतरच भारतात येईल, असे तो म्हणाला.- वैभव गजभिये, अमरावती (ऋषभचे वडील)

अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थी कुठे, कसे?- प्रणव पुनसे हा अमरावतीत घरी पोहोचला.- तुषार गंधे बुधवारी रात्री ७ वाजून ३० वाजता व्हिडीओ कॉलवरून हंगेरी बुडापेस्ट शहरात मुक्कामी. - तनिष सावंत बुधवारी रात्री ११ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्काम. - ऋषभ गजभिये हा गुरुवारी सकाळी ११ वाजता रोमानिया सीमेपासून ४० किलोमीटर लांब आहे.- स्वराज पुंड हा गुरुवारी सकाळी दिल्लीवरून विमानाने नागपूरकडे रवाना झाला. रात्री अमरावतीत घरी पोहोचला.- प्रणव भारसाकडे बुधवारी रात्री ८ वाजून ३० वाजता हंगेरी येथील बुडापेस्ट शहरात मुक्कामी. - मोहम्मद रिजवान बुधवारी रात्री १० वाजता रोमानिया बॉर्डरवरून विमानतळाकडे रवाना झाला.- कुणाल कावरे गुरुवारी सकाळी १० वाजून ३० वाजता दिल्ली येथे पोहोचला आहे.- नेहा लांडगे हिने बुधवारी रात्री टेस्क मॅसेजनुसार ती गुरुवारी दिल्ली येथे पोहोचली.

 

टॅग्स :warयुद्धStudentविद्यार्थी