शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 11:33 AM

वास्तव : आर्थिक अडचणीमुळे नैराश्य

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर बाजार : सातत्याने दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्ती, शेतीतील घटणारे उत्पादन, शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे वाढलेली कर्जफेडीची चिंता, अतिवृष्टी, सततचा पाऊस व आर्थिक अडचण जून त्यामुळे आलेले नैराश्य यामुळे जिल्ह्यात ऐन खरीप हंगामाच्या साडेतीन महिन्यांत ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्ये १८, जुलैमध्ये १९, ऑगस्टमध्ये १८ आत्महत्या झाल्या.

२०२४ चा खरीप हंगाम अर्धा संपला आहे. यात मूग, उडीद, सोयाबीन ही पिके पूर्णतः हातून गेली. आता कपाशी व तूर पीक तेवढे बाकी आहे. ही दोन्ही पिके आजच ६० टक्के हातून गेल्यातच जमा आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशातच जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे तालुक्याचे धगधगते वास्तव आहे. यात सप्टेंबरमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा समावेश नाही.

जिल्ह्यातील महिनानिहाय आत्महतेची आकडेवारी जानेवारी - २२ फेब्रुवारी - २६ मार्च - ३५एप्रिल  - २२ मे - २०जून  - १८जुलै  - १९ ऑगस्ट  - १८

जिल्ह्यात १८० पैकी फक्त ६५ आत्महत्या मदतीस पात्र 

  • जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात १८० शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यापैकी फक्त ६५ आत्महत्या शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या. 
  • पात्रपैकी ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. आत्महत्येची ८२ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याfarmingशेतीAmravatiअमरावती