शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 11:34 IST

वास्तव : आर्थिक अडचणीमुळे नैराश्य

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर बाजार : सातत्याने दरवर्षी येणारी नैसर्गिक आपत्ती, शेतीतील घटणारे उत्पादन, शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे वाढलेली कर्जफेडीची चिंता, अतिवृष्टी, सततचा पाऊस व आर्थिक अडचण जून त्यामुळे आलेले नैराश्य यामुळे जिल्ह्यात ऐन खरीप हंगामाच्या साडेतीन महिन्यांत ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जूनमध्ये १८, जुलैमध्ये १९, ऑगस्टमध्ये १८ आत्महत्या झाल्या.

२०२४ चा खरीप हंगाम अर्धा संपला आहे. यात मूग, उडीद, सोयाबीन ही पिके पूर्णतः हातून गेली. आता कपाशी व तूर पीक तेवढे बाकी आहे. ही दोन्ही पिके आजच ६० टक्के हातून गेल्यातच जमा आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशातच जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात १८० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे तालुक्याचे धगधगते वास्तव आहे. यात सप्टेंबरमध्ये झालेल्या शेतकरी आत्महत्यांचा समावेश नाही.

जिल्ह्यातील महिनानिहाय आत्महतेची आकडेवारी जानेवारी - २२ फेब्रुवारी - २६ मार्च - ३५एप्रिल  - २२ मे - २०जून  - १८जुलै  - १९ ऑगस्ट  - १८

जिल्ह्यात १८० पैकी फक्त ६५ आत्महत्या मदतीस पात्र 

  • जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत जिल्ह्यात १८० शेतकरी आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. यापैकी फक्त ६५ आत्महत्या शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात आल्या. 
  • पात्रपैकी ४९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. आत्महत्येची ८२ प्रकरणे प्रलंबित आहेत, तर ३३ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याfarmingशेतीAmravatiअमरावती