शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पालकांच्या दुर्लक्षामुळे पाल्यांच्या जीवावर टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:10 AM

लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे चांदूर बाजार : अलीकडे शहरी व ग्रामीण भागात लहान बालकांचा पाण्याच्या टाक्यात बुडून दुर्दैवी ...

लहानसहान गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे

चांदूर बाजार : अलीकडे शहरी व ग्रामीण भागात लहान बालकांचा पाण्याच्या टाक्यात बुडून दुर्दैवी मृत्यू होण्याच्या घटना खूप वाढल्या आहेत. बालकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे इतर लहान-सहान अपघातही होत असतात. यात कित्येक निरागस बालकांना जीव गमवावा लागतो, तर अनेक बालके जखमी होतात. तेव्हा असे अपघात टाळण्यासाठी बालकांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे अती गरजेचे झाले आहे.

प्रत्येक पालक मुलांच्या आरोग्याची खूप काळजी घेत असतो. त्याला थोडेफार दुखणे, खुपणे झाल्यास डॉक्टरांकडे नेणे, त्याला काय हवे, नको याची काळजी घेणे या गोष्टी केल्या जातात. आई-वडिलांच्या जीव की प्राण तो बालक असतात. परंतु, बरेचदा लहान-सहान गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि घटना घडल्यानंतर नशीबावर दोष देत असतो. पूर्वी संयुक्त कुटुंब पध्दतीमुळे बालकांना सांभाळण्याची जबाबदारी आजी-आजोबांची असायची. तेही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असत. बालक घराबाहेर खेळत असेल तर त्यांची दृष्टी सदैव त्यांच्यावर असायची. परंतु, अलीकडे विभक्त कुटुंब पध्दतीमुळे मुलांची जबाबदारी केवळ आयावर किंवा शेजाऱ्यांवर टाकून नोकरीला जाणे सुरू आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्य, शिक्षण याबाबतीत पालक जागृत असतात त्याप्रमाणे त्यांच्या दैनंदिन गोष्टीकरिता जागृत असणे आवश्यक आहे.

खेळ हा मुलांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे लहान मुले ज्यावेळी खेळतात त्यावेळी त्याचेकडे बारीक लक्ष ठेवणे, तो जेथे खेळतो तेथे कचरा, घाण, खड्डे, इजा पोहचविणाऱ्या वस्तू आहेत का याची काळजी घेणे, बरेचदा मुले खेळताना त्यांच्या आया कुठेतरी शेजारच्या महिलेसोबत गप्पा रंगवतात. त्यामुळे बालकांकडे दुर्लक्ष होते.

घरी वापरात येणाऱ्या विद्युत उपकरणे, इस्त्री, मिक्सर, टीव्ही, फ्रीज यापासून बालकांना दूर ठेवणे, घरात असलेल्या औषधांचा वापर केल्यानंतर त्या उंच जागी ठेवणे, त्यांच्या स्ट्रीप बाहेर कचरा पेटीत टाकणे, याकरिता सदैव दक्ष असावे तसेच बऱ्याच पालकांना लहान मुलांना प्रवासाला नेताना समोर ट्रॅकवर बसविणे, गाडी स्टँडवर उभी करून मुलांना गाडीवर बसवून ठेवणे, वाहन वेगाने चालविणे, बसमधून प्रवास करताना खिडकीजवळ उभे करणे या अतिशय वाईट सवयी असतात. त्यामुळे बालकाच्या जिविताला धोका होऊ शकतो.

ग्रामीण भागात अनेक पालक चुकीच्या गोष्टी करीत असतात. उन्हात शेतात नेणे, पाळीव जनावरांचे वैरण घालताना मुलांना सोबत ठेवणे, महिलासुध्दा चुलीवर किंवा गॅसवर स्वयंपाक करताना जवळ खेळवणे हे प्रकार जीवघेणे ठरू शकतात. बरेचदा काही महिला स्वयंपाकघरातून तयार केलेल्या पदार्थांचा गंज चिमट्याने अलगत उचलून जेवणाच्या ठिकाणी आणतात. अशावेळी आजूबाजूला मुलं असताना त्यांच्या अंगावर गरम पदार्थ पडून अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशावेळी पालकांची लहानशी चूक जीवावर बेतू शकते. तेव्हा असे लहानमोठे अपघात टाळण्यासाठी स्वतःमध्ये काही सुधारणा करून आपल्या बालकांकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.