शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

अंबानगरीत पुन्हा घाण कपात चहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 12:07 AM

अंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत.

आजाराला आमंत्रण : अतिशय घाण पाण्यात धुतले जातात कपसंदीप मानकर अमरावतीअंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत. त्याच अस्वच्छ कपात ग्राहकांना चहा देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या दिवसांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये दूषित व घाण जागेवरील अन्नपदार्थ प्राशन केल्याने किंवा घाण पाण्यात धुतलेल्या कापातच वारंवार चहा पिल्यानेही पोटाचे व इतर आजार वाढतात. अंबानगरीत काही हॉटेल्समध्ये अतिक्रमण करुन व हातगाड्यांवरील चहाच्या टपऱ्यांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून या कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या कायद्याची गरजच काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉटेलचालकांवर किंवा अन्नपदार्थांची जर अशाप्रकारे विक्री होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी एफडीएची आहे. परंतु, अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे वाटेल तशा गलथान सुविधा नागरिकांना पुरविल्या जातात. अन्नपदार्थांचे दामदुप्पट पैसे घेतल्यानंतरही मात्र त्यांना सुविधा पुरविली जात नाही. अंबानगरीत सात ते १० रुपये कट याप्रमाणे चहाची विक्री करण्यात येते. पण अनेक हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी वारंवार घाण पाणीच वापरले जातात. कप धुतल्यानंतर तासन्तास हे पाणी बदलले जात नाही. ग्र्राहकांच्या डोळ्यासमोर त्याच घाण पाण्यातून हे कप काढली जातात व त्यामध्ये चहा टाकण्यात येतो. मात्र, काही प्रमाणात घाण पाणी त्या चहासोबत आपल्या पोटात जाते. दरदिवसाला अनेक लोकांचे तोंड या कपांना लागते, त्यामुळे कप स्वच्छ पाण्याने धुवून निर्जंतुक करून वापरणे गरजेचे असते. परंतु असे न होता घाण पाण्यातच हे कप धुवून ग्राहकांना या कपांमध्ये चहा दिल्या जातो. अनेक हॉटेल चालकांने कप धुण्याचे पाणी घाण झाल्यानंतर पाणी त्वरित बदलले पाहिजे. एका टबात कप धुतल्यानंतरसुध्दा बाजूला दुसरा टब असला पाहिजे. हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन असले पाहिजे. या सर्व बाबी जर नसेल तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून हा सर्व प्रकार तपासला पाहिजे. जर कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्यांना सुधारणा नोटीस दिली पाहिजे. जर वारवांर हा प्रकार घडत असेल तर त्या हॉटेल चालकांचा परवाना रद्द करून त्यांच्या अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.